शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 7:10 PM

शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावण्यास सुरुवात केली आहे. 

ठळक मुद्दे २०१५ व २०१७ मध्ये फसला होता प्रयोगपश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात कमी पाऊस होण्याची शक्यता

- विकास राऊत 

औरंगाबाद : महाराष्ट्रात यावर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज सॅसकॉफ (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम) ने व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने यंदा राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. २०१५ मध्ये औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे प्रयत्न झाले. मात्र, ते फसले असून, यावेळी शासनाकडे काही हवामानतज्ज्ञांनी प्रयोगासाठी रेटा लावण्यास सुरुवात केली आहे. 

सॅसकॉफची काठमांडू येथे परिषद झाली. त्या परिषदेतील हवामानतज्ज्ञांच्या चर्चेनुसार राज्यातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिषदेच्या हवाल्यानुसार राज्यात कृत्रिम पावसाची गरज असल्याचे काही हवामानतज्ज्ञ बोलू लागले आहेत. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत अशा स्कीमवर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले गेले होते. औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर सी-डॉप्लर रडार बसविण्यात आले होते. ४५० कि़मी.च्या अंतरात पूर्ण राज्यात येथून प्रयोगासाठी विमानाने उड्डाण घेतले; परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. औरंगाबादमध्ये कृत्रिम पावसाचा केलेला प्रयोग फसला तरीही २०१७ मध्ये सोलापूर येथून प्रयोगासाठी प्रयत्न झाले. 

औरंगाबादेतील प्रयोगासाठी ३ हजार सिल्वर आयोडाईड, सिल्वर कोटेड नळकांडे (सिलिंडर) कोट्यवधी रुपयांतून खरेदी केले. ते सिलिंडर विमानतळावर ठेवल्याचे सांगण्यात आले. केवळ ५०० सिलिंडर वापरले, उर्वरित २५०० सिलिंडर उंदरांनी खाल्ले, की ख्याती वेदर मॉडिफिकेशन या कंपनीने परत नेले की, यंत्रणेने विकले, याची काहीही माहिती प्रशासनाकडे नाही. २०१५ मध्ये मराठवाड्यात केलेल्या प्रयोगातून जवळपास २०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद कंपनीने केली होती; परंतु प्रत्यक्षात तेवढा पाऊस झालाच नाही.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे दुष्परिणाम कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे पाऊस न झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. प्रयोगात वापरले जाणारे सिल्वर आयोडाईड हे रसायन विषारी असल्याने पर्यावरण आणि सस्तन प्राण्यांसाठी घातक आहे. या कारणास्तव आॅस्ट्रेलियामध्ये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे. विमानाने कृत्रिम पावसाचा प्रयोग मान्सूनपूर्व आणि मान्सुनोतर काळात करणे अतिशय धोकादायक असल्याचे मत हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.

संचालकांनी बोलणे टाळले राज्य आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबत माझ्याकडे काहीही माहिती नाही, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. त्यामुळे सध्या या विषयावर काहीही बोलणे शक्य नाही. तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल, आयुक्तालयाकडे अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :RainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा