शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत खोदल्या पावणेतीन हजार विहिरी; अल्पभूधारक शेतकरी अजूनही लाभापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:33 IST

दोन विहिरींतील ५०० फूट अंतराची मर्यादा ठरतेय अडसर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना २ हजार ८३५ विहिरी घेता आल्या. तथापि, अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही पिके घेता यावीत, यासाठी विहिरी खोदण्याची इच्छा आहे; परंतु दोन विहिरीतील ५०० फूट अंतराच्या मर्यादेमुळे इच्छा असूनही अनेकजण या विहिरीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

तथापि, जि.प.चे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले की, सिंचन विहिरींसाठी देखील ५०० फूट अंतराची ही जाचक अट आहे. ती कमी करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जि. प. मार्फत विशेष घटक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनांतर्गत विहिरींसाठीची अंतराची ही मर्यादा कमी करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास अनेकांना विहिरींचा लाभ घेणे सुकर होईल.

अनु. जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत विहिरीसाठी अनुदान दिले जाते. मागासवर्गीय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या योजना अंमलात आणल्या. त्यानुसार सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांत दोन्ही योजनांमध्ये जिल्ह्यात एकूण २ हजार ८३५ विहिरी उभारण्यात आल्या. त्यावर ५४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. सन २०२१-२२ मधील विहिरींची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर सन २०२२-२३ या वर्षात ४५० शेतकऱ्यांनी विहिरींसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक न झाल्यामुळे त्यांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे.

भूजल पातळीजिल्ह्यात सरासरी १२.३५ मीटर खोल एवढी भूजल पातळी आहे. अलीकडच्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. शेतात विंधन विहिरीपेक्षा विहीर खोदणे पर्यावरणाच्या दृष्टीने हिताचे आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचाही हाच अभिप्राय आहे. विंधन विहिरींमुळे भूगर्भातील खोलवरचे पाणी उपसले जात असल्यामुळे भूजलाची पातळी खोल जात आहे. दुसरीकडे, विहिरींमुळे पावसाचे पडणारे पाणी साचले जाते. पाण्याचे झरे सगळीकडे पाझरतात. पाणीपातळी सुरक्षित राहते.

कृषी स्वावलंबन योजना वर्ष- विहिरी२०१७-१८- ४९० २०१८-१९- ६९४ २०१९-२०- ५९८ २०२०-२१- ४९७ २०२१-२२- १६५

कृषी क्रांती योजना वर्ष- विहिरी२०१७-१८- १६२०१८-१९- १६७२०१९-२०- १३२२०२०-२१- ७२२०२१-२२- ०४

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती