शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तिघांना राष्ट्रपतीपदक

By admin | Updated: August 15, 2014 00:03 IST

परभणी : पोलिस दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल दिले जाणारे अतिशय प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक परभणी जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले.

परभणी : पोलिस दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल दिले जाणारे अतिशय प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक परभणी जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे तब्बल पाच वर्षानंतर परभणी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा या पदकाने सन्मान होत आहे. एकाच वेळी तीन पदक जिल्ह्यातील पोलिसांना प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असावी.
परभणी जिल्ह्यातील राखीव पोलिस निरीक्षक पंडित रघुनाथ राठोड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ शेषराव मरकंटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंचक सागरराव बचाटे या तिघांची राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे. पंढरीनाथ रघुनाथराव राठोड यांनी पोलिस दलात मागील ३४ वर्षे सेवा केलेली आहे. उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांनी पोलिस निरीक्षक केंद्र सोलापूर येथे कार्यरत असताना नवीन केंद्राच्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेले कार्य प्रशंसनीय ठरले. त्यांच्या सेवेच्या काळात जालना, उस्मानाबाद, परभणी येथे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.
पंढरीनाथ शेषराव मरकंटे यांनी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केले. पोलिस दलातून जुलै २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पोलिस दलामध्ये निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल मरकंटे यांचा यापूर्वीही गौरव झाला.
सुमारे १५० गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळालेला आहे. परभणी जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर व पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरील तिघांचे स्वागत केले आहे.(प्रतिनिधी)
बचाटे यांनी केली २०२ आरोपींना अटक
शेंडगा येथील रहिवासी असलेले मंचक सागरराव बचाटे हे प्रमाणिक पोलिस कर्मचारी म्हणून ओळखले जातात. वारकरी सांप्रदायाच्या संस्कारात वाढलेल्या बचाटेंचे वडील ह.भ.प.सागरराव बचाटे यांनी आळंदी ते पंढरपूर वारी कधी चुकू दिली नाही. बचाटे यांनी ३५ वर्षे पोलिस दलात कार्य केले. त्यांनी १४६ फरार आरोपींना तसेच वारंटमधील ५६ आरोपींना अटक केली. सोनपेठ, नानलपेठ, डीएसबी, एसीबी, एलसीबी, दैठणा, महामार्ग जिंतूर, वाहतूक शाखा या ठिकाणी कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेतली आहे.