शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

निर्णय घेण्याची धमक लागते- पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:13 AM

राज्यात २८८ आमदारांपैकी मी एक आहे. खुर्चीचा मोह अनेकांना सुटत नाही. राज्यकर्ते जेव्हा खुर्चीला चिकटून बसणे बंद करतील त्या दिवसापासून जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले असतील. निर्णय घेण्याची धमक असावी लागते. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये माझा समावेश आहे. महिलांचे आरोग्य, महिलांचा स्वाभिमान आणि महिला सक्षमीकरणाबद्दल आग्रही भूमिका घेण्याची धमक दाखवली नसती, तर माझे मंत्रिपद काय कामाचे असते, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देबचत गट महोत्सव : ‘अस्मिता’ योजनेंतर्गत सॅनेटरी नॅपकीन वाटप शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात २८८ आमदारांपैकी मी एक आहे. खुर्चीचा मोह अनेकांना सुटत नाही. राज्यकर्ते जेव्हा खुर्चीला चिकटून बसणे बंद करतील त्या दिवसापासून जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले असतील. निर्णय घेण्याची धमक असावी लागते. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये माझा समावेश आहे. महिलांचे आरोग्य, महिलांचा स्वाभिमान आणि महिला सक्षमीकरणाबद्दल आग्रही भूमिका घेण्याची धमक दाखवली नसती, तर माझे मंत्रिपद काय कामाचे असते, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केले.विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या विभागीय सरस महोत्सव ‘सिद्धा २०१७-१८’चे उद्घाटन रविवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आ. प्रशांत बंब, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, उपायुक्त पारस बोथरा, सूर्यकांत हजारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जि.प. उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये १८० स्टॉल्स उभारण्यात आले असून, मराठवाड्यातील जवळपास २०० बचत गट या महोत्सवात सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी पंकजा मुंडे यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सना भेट देऊन बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची पाहणी केली.याप्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या की, नीर आणि नारी जिथे सुरक्षित असते तो समाज पुढारलेला असतो. त्यामुळे महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी आम्ही भूमिका घेतली. जलयुक्त शिवार योजनेद्वारे मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्याचा प्रयत्न केला. जर ७० वर्षांपूर्वी हे काम झाले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, माझी अस्मिता, जलयुक्त शिवार, स्वच्छता मोहीम, अशा जनतेच्या मनातील अनेक योजना भाजप सरकारच्या काळात सुरू झाल्या. घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी पंतप्रधानांना आवाहन करावे लागले. आता मराठवाडा बेसलाईनच्या सर्वेक्षणात हगणदारीमुक्तीच्या मार्गावर आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी आभार मानले.कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य असलेल्या बचत गट, पत्रकार व बँक अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.बचत गटांना देणार १ मेपासून सॅनिटरी नॅपकीनपंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी अस्मिता योजनेंतर्गत अलीकडच्या पंधरा दिवसांत १० हजार बचत गटांनी नोंदणी केली आहे. १ मेपासून बचत गटांना सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. बचत गटांना सक्षम करण्यासाठी शून्य टक्का व्याज आकारून कर्ज देण्यात येत येणार आहे. बचत करणे ही महिलेची ताकत आहे. महिला कोणाच्याही ऋणात राहू इच्छित नाहीत. त्यांच्यात स्वाभिमान टिकून राहावा यासाठी महिलांच्या नावे १ लाख ५० हजार ९३४ घरकुले करण्यात आली आहेत. राज्यात आता प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बचत गटांना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम देण्यासंबंधी विचार केला जात आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषदcommissionerआयुक्तWomenमहिलाwomen and child developmentमहिला आणि बालविकास