शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीचा गोडवा!; मराठीत मुख्यमंत्री, महापौरांना लिहिली हजारो पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 6:55 PM

उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखनाचा उपक्रम.

ठळक मुद्देउर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : मोबाईलच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना आज पोस्टकार्ड काय आहे? हे माहीतच नाही. तीन दशकांपूर्वीपर्यंत पोस्ट विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात येत होता. या दुर्मिळ आठवणींना उजाळा देण्याचे काम रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनने सुरू केले आहे. उर्दू भाषेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही मराठीचा गोडवा वाटावा म्हणून मराठीत मुख्यमंत्री, महापौर यांच्या नावाने विविध विषयांवर पत्र लिहून घेण्यात येत आहेत. बुधवारी मराठी भाषा दिनानिमित्त आणखी व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिर्झा अब्दुल खय्युम नदवी यांनी दिली.

जानेवारी २०१९ पासून रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनने शहरातील उर्दू भाषेच्या विविध शाळांमध्ये शुद्ध मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संयोजकांकडून शहरातील सर्वच उर्दू भाषेच्या शाळांमध्ये मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शहरातील ५७ उर्दू हायस्कूल, २५५ प्राथमिक शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. २५ हजार पोस्टकार्ड आतापर्यंत पोस्टाकडून घेण्यात आले आहेत. त्यातील १६ हजार विद्यार्थ्यांनी ते लिहून दिले आहेत. 

विद्यार्थ्यांना ‘माझ्या शहराला भेट दिलीच पाहिजे कारण...’, ‘माझ्या शहरातील चांगला माणूस’, ‘माझ्या शहरातील प्रेक्षणीय स्थळ’, ‘आमच्या शहरातील अडचणी’, ‘माझे आवडते पुस्तक’, असे विषय देण्यात आले होते. मराठी भाषा दिनानिमित्त जास्तीत जास्त पत्र विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेत लिहून घेण्यात येणार आहेत. या दिनाचे औैचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेत फक्त मराठी भाषेतच संभाषण केले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नदवी यांनी नमूद केले. या उपक्रमाला ‘उड्डाण’ या संस्थेने सहकार्य केले आहे. 

उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते. अनेक शाळांमध्ये द्वितीय भाषा मराठी असते. शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलता येते, वाचता येते. अवघड विषय म्हणून अनेक विद्यार्थी मराठीकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनSchoolशाळाPost Officeपोस्ट ऑफिस