शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

शहरातील ३० सिमेंट रस्ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अशक्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:10 IST

महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही कामाची कासवगती कायम

ठळक मुद्देआणखी एक वर्ष लागणार जानेवारी २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते भूमिपूजन ३० पैकी फक्त १९ रस्त्यांची कामे सुरू करता आली आहेत.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या अनुदानातून शहरात ३० रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांचे काम कासवगतीने सुरू आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत कामाची डेडलाईन आहे. नियोजित वेळेत रस्ते पूर्ण होणार नाहीत. डिसेंबर २०२१ मध्ये सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा अंदाज आहे. अलीकडेच मनपा आयुक्तांनीही रस्त्यांच्या कामाची गती वाढवा असे आदेश दिले. त्यानंतरही कामे संथगतीने सुरू आहेत.

जानेवारी २०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टी.व्ही. सेंटर चौकात ३० रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन केले होते. मागील ७ महिन्यांमध्ये मनपाला ३० पैकी फक्त १९ रस्त्यांची कामे सुरू करता आली आहेत. मागील आठवड्यात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रस्त्यांची पाहणी केली. त्यांनी कंत्राटदारांना कामाची गती वाढवा, असे आदेश दिले. 

आयुक्तांच्या पाहणीनंतर दुसऱ्याच दिवशी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही रस्ते कामांची माहिती घेतली. अपूर्ण रस्त्यांमुळे पावसाळ्यात नागरिकांची, व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कंत्राटदारांनी गती न वाढवल्यास वेगळा विचार केला जाईल, अशी तंबीही महापौरांनी दिली. कंत्राटदारांवर किंचितही फरक पडला नाही. जानेवारी महिन्यात सुरू केलेल्या पाच रस्त्यांची कामे १५ जुलैपर्यंत पूर्ण होतील, असा दावा महापौरांनी केला होता. नंतर ३१ जुलैची तारीख सांगण्यात आली. आता १५ आॅगस्टपर्यंत कामे होतील असे सांगण्यात येत आहे.

४ मोठ्या कंत्राटदारांची निवड१०० कोटींच्या कामातील ३० रस्त्यांसाठी महानगरपालिकेने चार निविदा काढल्या. एका कंत्राटदाराला प्रत्येकी २२ ते २५ कोटी रुपयांपर्यंतचे काम मिळाले. सर्व कंत्राटदार मोठे आहेत. कामे लवकर होतील, असा अंदाज मनपा पदाधिकारी, प्रशासनाने लावला होता. मोठे कंत्राटदार अनुभव नसल्याप्रमाणे काम अत्यंत कासवगतीने करीत आहेत.

गोमटेश मार्केट येथील रस्ता१०० कोटींत पैठणगेट ते सिटीचौक हा गोमटेश मार्केट येथील रस्ताही आहे. लवकरच महालक्ष्मी, दसरा, दिवाळी आदी मोठे सण येणार आहेत. अशा अवस्थेत मनपा रस्ता खोदून ठेवणार का? असा प्रश्न या भागातील व्यापारी उपस्थित करीत आहेत.

१२५ कोटींची स्वतंत्र निविदामहाराष्ट्र शासन शहरातील रस्त्यांसाठी आणखी १२५ कोटी रुपये देणार आहे. या निधीतून किमान ४० ते ४५ रस्ते करण्यात येणार आहेत. या कामांसाठी रस्तानिहाय स्वतंत्र निविदा काढण्याचा विचारही प्रशासन करीत आहे. छोटे-छोटे कंत्राटदार ही कामे त्वरित करून देतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद