शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुका तहानलेला

By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST

लालखाँ पठाण , गंगापूर गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरला परवानगी देण्यास तहसील प्रशासन उदासीन आहे.

 लालखाँ पठाण , गंगापूर गंगापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरला परवानगी देण्यास तहसील प्रशासन उदासीन आहे, त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिल्लेगाव, शेंदुरवादा, लासूर स्टेशन, तुर्काबाद या परिसरातील गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी या करिता ग्रामपंचायतीच्या ठरावासह पंचायत समितीकडे टँकर मिळावे यासाठी प्रस्ताव सादर करून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. सदर प्रकरण तहसीलच्या अखत्यारीतील असल्याने पंचायत समितीने तांत्रिक मान्यता देऊन तहसील कार्यालयात सादर केले. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर २४ तासांत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी शहानिशा करून तात्काळ अहवाल देऊन गरज असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आदेश द्यावे व टँकर सुरू करावे असे शासनाचे सक्त आदेश आहेत, असे असताना या आदेशाला तहसीलदारांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. निवडणूक काळात प्रचारादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गंगापूर येथे आले असता पाणीटंचाईसंदर्भात काही सरपंचांनी मंत्रिमहोदयांच्या कानी समस्या घातल्या होत्या. तहसील प्रशासन हे टंचाईग्रस्त गावास टँकर प्रस्ताव मंजूर करीत नसल्याचे गाºहाणेसुद्धा पदाधिकार्‍यांनी मांडले. यावेळी पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना सक्त ताकीद देऊन पाणीटंचाईसंदर्भात कुठल्याच प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही. नागरिकांना वेळीच पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्या आदेशालासुद्धा तहसीलदारांनी कानाडोळा करीत प्रस्ताव मंजुरीस दिरंगाई केली. काही ठिकाणी गेल्या दीड महिन्यांपासून पाण्याचे टँकर प्रस्ताव मंजुरीविना पडून असून यास तहसील प्रशासनच जबाबदार असल्याचे सरपंच सांगत आहेत. तालुक्यात गतवर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याकारणाने ओढे-नाले खळखळून वाहिले नाहीत, त्यामुळे परिसरातील विहिरी, शेततळे, पाझर तलाव अद्याप कोरडेच आहेत. विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. गोदावरी नदीवरील पैठण येथील धरणाची पाणीपातळी उन्हामुळे दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तालुक्यातील अतिमहत्त्वाचे टेंभापुरी व शिल्लेगाव मध्यम प्रकल्प पावसाळा प्रारंभापासूनच कोरडेठाक पडलेले आहेत.