शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:33 PM

कोल्हाटी भातु समाजातर्फे पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज, वधु-वर परिचय व गुण गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

वाळूज महानगर : शिक्षणाअभावी कोल्हाटी समाज विकासापासून कोसो दूर आहे. समाजाची प्रगती करायची असेल, सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणासाठी मुलांना पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत पंढरपूर येथे रविवारी (दि.१७) आयोजित कोल्हाटी समाजाच्या राज्यस्तरीय समाज, वधू-वर परिचय व गुणगौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.विखुरलेले कोल्हाटी समाजबांधव एकत्र यावेत, एकमेकांची ओळख व्हावी. तसेच समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोल्हाटी भातु समाजातर्फे पंढरपूर येथील वैष्णोदेवी उद्यानात रविवारी राज्यस्तरीय कोल्हाटी समाज, वधु-वर परिचय व गुण गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जयराम मुसळे म्हणाले की, परिस्थितीनुसार समाजाने बदलणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार अंमलात आणा. पूर्वी शिक्षण नसल्याने समाजाची वाईट अवस्था होती. पण आता शिक्षणाची सोय झाली असून, प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळे इतर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. असे सांगितले.

प्रिया काळे यांनी शिक्षण घेतल्या शिवाय समाजाचा विकास नाही असे सांगत शिक्षणासाठी आई-वडिलांना मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी प्रभाकर गंगावणे, युवराज गांगवे, अविष्कार गंगावणे, राहुल पवार आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. १०३ वरांनी तर ४३ वधुंनी विवाहासाठी नोंदणी केली.

कार्यक्रमाला आदित्य जाधव, प्रविण भोसले, श्रीकृष्ण काळे, उमाकांत पवार, गणेश जाधव, नंदकिशोर मुसळे, भाऊलाल काळे, लता मुसळे, काजल काळे, नारायण काळे, एकनाथ काळे, सुनिल काळे, रघुनाथ जाधव, सोमिनाथ काळे, मदन काळे, दिलीप पवार आदींसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाफेश्वर गंगावणे यांनी केले. तर संतोष चंदन यांनी आभार मानले.

टॅग्स :WalujवाळूजSocialसामाजिक