शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

उजाडता मावळता पाण्याचीच चिंता

By admin | Updated: February 1, 2015 00:36 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव माजलगाव धरणापासून ३ किमी अंतरावर असलेल्या ३५० उंबऱ्याच्या मनूरवाडी येथे ४-५ वर्षांपासून पाण्याची गंभीर परिस्थिती आहे.

पुरुषोत्तम करवा , माजलगावमाजलगाव धरणापासून ३ किमी अंतरावर असलेल्या ३५० उंबऱ्याच्या मनूरवाडी येथे ४-५ वर्षांपासून पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. मात्र, सातत्याने दुर्लक्ष झाले. परिणामी यावर्षी जानेवारीतच पाण्याची परिस्थिती बिकट झाली. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सकाळपासून गावाबाहेरील विहिरीवर बैलगाड्यांसह लोकांच्या रांगा लागतात.माजलगाव शहरापासून ४ कि.मी. तर माजलगाव धरणापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या मनूरवाडी येथे ३५० घरे असून गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. या गावात १२ ते १५ हातपंप व विहिरी आहेत. मात्र हे सर्व जलस्त्रोत आटल्याने पाणिटंचाई निर्माण झाली आहे. मागील ३-४ वर्षांपासून अशीच परिस्थिती असून ग्रामस्थ त्रस्त आहेत. मनूरवाडीच्या ग्रामपंचायतीने दोन महिन्यापूर्वीच टँकरची मागणी केली होती; परंतु हे टँकर १५ दिवसांपूर्वी चालू झाले. टँकर दोनच खेपा करत असून ते ही गावाऐवजी गावाबाहेर उभा केले जाते. त्यामुळे गावातील आबालवृद्धांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. यातून विद्यार्थीही सुटले नाहीत. त्यांना दप्तर खुंटीला टांगून पाण्यासाठी पळावे लागते. ४टँकर वेळेत येत नसल्यामुळे काम सोडून त्याची वाट पहात बसावे लागते, असे बबन मोरे यांनी सांगितले.माझ्याकडे सहा गावांचा कारभार असल्यामुळे मनूरवाडीकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नसतो. आठवड्यातून एकदा मी मनूरवाडीला जातो. भारत निर्माणचे काम अंदाजपत्रकानुसारच झाले असून टँकरचे पाणी गावातील विहिरीत सोडण्यासाठी रस्ता दुरूस्त करण्यात येईल, असे ग्रामसेवक एन. पी. मोरे यांनी सांगितले.... तर नियोजन शक्य४टँकर रस्त्यावर उभे केल्यामुळे अर्ध्या गावाला पाणी मिळतच नाही. सदस्यांना ग्रामसेवक व सरपंच विचारात घेत नसल्यामुळे नियोजन होत नाही, असे एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले. १९७२ ला देखील पाण्याची अशी परिस्थिती नव्हती. नियोजनाच्या अभावामुळे गावात पाण्याची भयानक परिस्थिती आहे.- पंडित शिंदे, मजूरआम्हाला शेतातील कामे सोडून २ कि.मी.वरून पाणी आणावे लागते. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. - चत्रभूज पवार, शेतकरीटँकरने आणलेले पाणी पिण्यायोग्य नसते. मात्र, गावात पाणीच नसल्यामुळे मिळेल त्या पाण्याने तहान भागविण्याशिवाय पर्याय नाही. पाणी आणण्यासाठी दूर जावे लागते. - गोविंद शिंदे, ग्रामस्थयोजनेची विहीर कोरडी पडल्याने गाव तहानलेले आहे. सध्या टँकर सुरु असून, गावकरी टँकरचे पाणी शिस्तीत भरत नसल्याने पाणी पुरत नाही. - कौशल्या दशरथ थोरात, सरपंचगेल्या काही वर्षांपासून गावाला पाणिटंचाईची समस्या भेडसावत आहे. यापूर्वी उन्हाळ््याच्या अखेरच्या टप्प्यात ही समस्या उद्भवत असे. मात्र, आता जानेवारीतच विहीरी तळ गाठू लागल्या आहेत. पुढच्या पिढीची चिंता वाटते. - अनंत जगताप, ग्रामस्थपाणीटंचाईने गावचे जनजीवन विस्कळीत केले आहे. पाणी मिळविणे हाच सर्वांचा प्राधान्यक्रम बनला आहे. त्यामुळे शेतातील कामे, मुलांची शाळा, पाहुण्यांची सरबराई यासह दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे. ४सकाळ होताच इतर सर्व कामे सोडून पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.