शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:21 IST

शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत.

ठळक मुद्देशेतऱ्यांना दिलासा : हाय व्होल्टेज वीज जोडणी; वीज चोरीला वाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतक-यांची आता कायमची सुटका होणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतक-यांनी कोटेशन भरलेले आहे. तरीही मराठवाड्यातील ६७ हजार ३७४, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. या शेतकºयांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एसव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लोड येऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी औरंगाबाद झोन कार्यालयाने सर्व शिवारांमध्ये फिरून सर्वेक्षण पूर्ण केले आहे.दर वाढल्याने दुसºयांदा अंदाजपत्रकयासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, ‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेसाठी महावितरणने औरंगाबाद झोनमध्ये सर्वेक्षण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सध्या कार्यरत कृषिपंप किती, किती कृषिपंपांना मीटर आहेत, या योजनेसाठी रोहित्रांची गरज किती, उच्चदाब वाहिन्यांची आवश्यकता किती आदी माहिती संकलित करण्यात आली. यासंदर्भात अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते; पण उपकरणे व साहित्याचे दर वाढल्यामुळे पहिले अंदाजपत्रक रद्द करण्यात आले असून, नव्याने अंदाजपत्रक तयार केले जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी