शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:21 IST

शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत.

ठळक मुद्देशेतऱ्यांना दिलासा : हाय व्होल्टेज वीज जोडणी; वीज चोरीला वाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतक-यांची आता कायमची सुटका होणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतक-यांनी कोटेशन भरलेले आहे. तरीही मराठवाड्यातील ६७ हजार ३७४, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. या शेतकºयांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एसव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लोड येऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी औरंगाबाद झोन कार्यालयाने सर्व शिवारांमध्ये फिरून सर्वेक्षण पूर्ण केले आहे.दर वाढल्याने दुसºयांदा अंदाजपत्रकयासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, ‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेसाठी महावितरणने औरंगाबाद झोनमध्ये सर्वेक्षण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सध्या कार्यरत कृषिपंप किती, किती कृषिपंपांना मीटर आहेत, या योजनेसाठी रोहित्रांची गरज किती, उच्चदाब वाहिन्यांची आवश्यकता किती आदी माहिती संकलित करण्यात आली. यासंदर्भात अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते; पण उपकरणे व साहित्याचे दर वाढल्यामुळे पहिले अंदाजपत्रक रद्द करण्यात आले असून, नव्याने अंदाजपत्रक तयार केले जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी