शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
3
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
5
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
6
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
7
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
8
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
9
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
10
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
11
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
13
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
15
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
16
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
17
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
18
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
19
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
20
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

एका डीपीवर आता दोनच कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:21 IST

शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत.

ठळक मुद्देशेतऱ्यांना दिलासा : हाय व्होल्टेज वीज जोडणी; वीज चोरीला वाव नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतक-यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने उच्चदाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून, यापुढे एका डीपीवर (रोहित्र) जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतक-यांची आता कायमची सुटका होणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी शेतक-यांनी कोटेशन भरलेले आहे. तरीही मराठवाड्यातील ६७ हजार ३७४, तर मराठवाड्यासह औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत तब्बल ८७ हजार ४८४ शेतकरी अद्यापही वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. या शेतकºयांसह नव्याने मागणी करणाºया ग्राहकाला ‘एसव्हीडीएस’ या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. आकडे टाकून विजेचा वापर करणारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे लोड येऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण मोठे आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार आहे. या नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी औरंगाबाद झोन कार्यालयाने सर्व शिवारांमध्ये फिरून सर्वेक्षण पूर्ण केले आहे.दर वाढल्याने दुसºयांदा अंदाजपत्रकयासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, ‘एचव्हीडीएस’ या नव्या योजनेसाठी महावितरणने औरंगाबाद झोनमध्ये सर्वेक्षण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सध्या कार्यरत कृषिपंप किती, किती कृषिपंपांना मीटर आहेत, या योजनेसाठी रोहित्रांची गरज किती, उच्चदाब वाहिन्यांची आवश्यकता किती आदी माहिती संकलित करण्यात आली. यासंदर्भात अंदाजपत्रकही तयार करण्यात आले होते; पण उपकरणे व साहित्याचे दर वाढल्यामुळे पहिले अंदाजपत्रक रद्द करण्यात आले असून, नव्याने अंदाजपत्रक तयार केले जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी