शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राज्यपालांच्या 'स्वाक्षरी'कडे साऱ्यांचे लक्ष; राज्यातील २२ महापालिकांचे प्रभाग आराखडे होणार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:52 IST

भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वॉर्ड आणि प्रभाग आराखडा तयार करण्याचा अधिकार आपल्याकडे घेतला. या निर्णयावर राज्यपालांची स्वाक्षरी कधी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निर्णयाचा प्रभाव राज्यातील २२ महापालिकांवर थेट पडणार आहे. ज्या महापालिकांनी आराखडे तयार करून निवडणूक आयोगाकडे सादर केले, ते तयार होत असलेले रद्द होणार आहेत.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका कळीचा मुद्दा बनला आहे. राज्य शासनाने निवडणुकीची गुंतागुंत प्रचंड वाढवून ठेवली आहे. अगोदर महापालिकांमधील वॉर्ड पद्धत रद्द करून तीन सदस्यांची प्रभाग पद्धत अमलात आणण्यासाठी कायद्यात तरतूद केली. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपत असलेल्या आणि संपलेल्या महापालिकांमध्ये प्रभागरचना तयार करण्याचे काम केले. २२ प्रमुख महापालिकांमधील प्रभाग पद्धतीवर कामही सुरू करण्यात आले. बहुतांश महापालिकांनी आराखडे तयार करून आयोगाला सादरही केले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने विकास गवळी यांच्या याचिकेत निवडणुका वेळेवर घेण्याचे आदेश दिले.

ओबीसी आरक्षणाविना निवडणुका घेण्यास सत्ताधारी, विरोधक तयार नाहीत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याचे असलेले अधिकार काढून घेण्यात आले. त्यासोबतच आयोगाला वॉर्ड रचना आणि प्रभागरचना तयार करण्याचे असलेले अधिकारही शासनाने काढून घेतले. या निर्णयावर राज्यपालांनी सही केलेली नाही. निवडणूक याचिकांचे काम पाहणाऱ्या विधिज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आयोगाने मागील सहा महिन्यांत तयार केलेले आराखडे, ज्या महापालिकांनी आयोगाकडे सादर केलेले आराखडे आपोआप शासननिर्णयामुळे रद्द होणार आहेत. भविष्यात शासनाच्या देखरेखीखाली वॉर्ड, प्रभागरचना तयार होईल. या निर्णयालाही काही नागरिक आव्हान देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

या आहेत २२ महापालिका: मनपा- वॉर्ड- प्रभागऔरंगाबाद - १२६-४२नवी मुंबई- १२२-४१वसई-विरार- १२६- ४२कोल्हापूर- ९२-३१कल्याण डोंबिवली-१३३-४४ठाणे- १४२-४७उल्हासनगर-८९-३०नाशिक- १३३-४४पुणे- १७३-५८पिंपरी चिंचवड-१३९-४६सोलापूर-११३- ३८अकोला-९१-३०अमरावती-९८-३३नागपूर- १५६-५२चंद्रपूर-७७-२६लातूर-८१-२७परभणी- ७६-२५भिवंडी-निजामपूर-१०१-३४मालेगाव-९५-३२मीरा-भाईंदर-१०६-३५नांदेड-वाघाळा-९२-३०

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीState Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद