शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:33 IST

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : वेरुळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबाद शहराचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. मात्र, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तीन शहरांच्या पलीकडे विमानसेवा झेप घेत नसल्याची परिस्थिती आहे. नवीन विमान कंपनीही सध्या सुरू असलेल्या शहरांसाठीच विमानसेवा सुरू करीत आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षाच औरंगाबादकर करीत आहेत.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसाठी रोज प्रत्येकी दोन विमानांचे उड्डाण होत आहे. आता फ्लायबिग एअरलाईन्स १५ मे पासून हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद विमानसेवा सुरू करणार आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या तीन शहरांशिवाय इतर शहरांसाठी विमानसेवा कधी सुरू होणार, असा सवाल आहे. नव्या शहरांसाठी औरंगाबादहून किती प्रवासी, प्रतिसाद मिळेल, याबाबत विमान कंपन्यांना प्रश्न पडत आहे. टूर ऑपरेटरच्या पर्यटन परिषदा झाल्यास औरंगाबादचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. तसे झाल्यास औरंगाबादचे पर्यटन क्षेत्र व्यापक होऊ शकेल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

या शहरांसाठी विमानसेवेची प्रतीक्षा ?अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसह पुणे, नागपूर, इंदोर, गोवा, भोपाळ, बोधगया या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी उद्योजक, व्यापारी, पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. कोरोनापूर्वी अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होती. परंतु, कोरोना विळख्यात बंद पडलेली ही कनेक्टिव्हिटी अजूनही पूर्ववत झालेली नाही.

उडान योजनेत समावेश व्हावाएकाच शहरासाठी औरंगाबादहून रोज एकापेक्षा जास्त विमानसेवा असल्याने तिकिटांचे दर सध्या नियंत्रणात आहेत, ही चांगली बाब आहे. औरंगाबाद हे केंद्र सरकारच्या उडान योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना येथून नव्या सेवा देण्यास जास्त रस नाही.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावाबंगळुरू आणि अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी फ्लायबिग आणि एअर इंडियाकडे करण्यात आली आहे. या शहरांना प्रारंभी आठवड्यातून काही दिवसही चालविता येईल. पुणे, उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उदयपूरची विमानसेवा हिवाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आकासा एअरलाइन्सच्या विमानसेवेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ