शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:33 IST

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : वेरुळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबाद शहराचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. मात्र, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तीन शहरांच्या पलीकडे विमानसेवा झेप घेत नसल्याची परिस्थिती आहे. नवीन विमान कंपनीही सध्या सुरू असलेल्या शहरांसाठीच विमानसेवा सुरू करीत आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षाच औरंगाबादकर करीत आहेत.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसाठी रोज प्रत्येकी दोन विमानांचे उड्डाण होत आहे. आता फ्लायबिग एअरलाईन्स १५ मे पासून हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद विमानसेवा सुरू करणार आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या तीन शहरांशिवाय इतर शहरांसाठी विमानसेवा कधी सुरू होणार, असा सवाल आहे. नव्या शहरांसाठी औरंगाबादहून किती प्रवासी, प्रतिसाद मिळेल, याबाबत विमान कंपन्यांना प्रश्न पडत आहे. टूर ऑपरेटरच्या पर्यटन परिषदा झाल्यास औरंगाबादचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. तसे झाल्यास औरंगाबादचे पर्यटन क्षेत्र व्यापक होऊ शकेल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

या शहरांसाठी विमानसेवेची प्रतीक्षा ?अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसह पुणे, नागपूर, इंदोर, गोवा, भोपाळ, बोधगया या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी उद्योजक, व्यापारी, पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. कोरोनापूर्वी अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होती. परंतु, कोरोना विळख्यात बंद पडलेली ही कनेक्टिव्हिटी अजूनही पूर्ववत झालेली नाही.

उडान योजनेत समावेश व्हावाएकाच शहरासाठी औरंगाबादहून रोज एकापेक्षा जास्त विमानसेवा असल्याने तिकिटांचे दर सध्या नियंत्रणात आहेत, ही चांगली बाब आहे. औरंगाबाद हे केंद्र सरकारच्या उडान योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना येथून नव्या सेवा देण्यास जास्त रस नाही.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावाबंगळुरू आणि अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी फ्लायबिग आणि एअर इंडियाकडे करण्यात आली आहे. या शहरांना प्रारंभी आठवड्यातून काही दिवसही चालविता येईल. पुणे, उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उदयपूरची विमानसेवा हिवाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आकासा एअरलाइन्सच्या विमानसेवेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ