शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

औरंगाबादचे नाव सातासमुद्रापार, विमानांची झेप अवघ्या तीन शहरांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:33 IST

नव्या शहरांना कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा : सध्या सुरू असलेल्या मार्गावरच विमानसेवेचा नव्या एअरलाइन्सचा कल

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : वेरुळ, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे औरंगाबाद शहराचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. मात्र, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तीन शहरांच्या पलीकडे विमानसेवा झेप घेत नसल्याची परिस्थिती आहे. नवीन विमान कंपनीही सध्या सुरू असलेल्या शहरांसाठीच विमानसेवा सुरू करीत आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढीची प्रतीक्षाच औरंगाबादकर करीत आहेत.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये दिल्ली, मुंबईसाठी रोज प्रत्येकी दोन विमानांचे उड्डाण होत आहे. आता फ्लायबिग एअरलाईन्स १५ मे पासून हैदराबाद - औरंगाबाद - हैदराबाद विमानसेवा सुरू करणार आहे. ही विमानसेवा सकाळच्या वेळेत राहणार असल्याने हैदराबाद, तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे. या तीन शहरांशिवाय इतर शहरांसाठी विमानसेवा कधी सुरू होणार, असा सवाल आहे. नव्या शहरांसाठी औरंगाबादहून किती प्रवासी, प्रतिसाद मिळेल, याबाबत विमान कंपन्यांना प्रश्न पडत आहे. टूर ऑपरेटरच्या पर्यटन परिषदा झाल्यास औरंगाबादचे महत्त्व लक्षात येऊ शकेल. तसे झाल्यास औरंगाबादचे पर्यटन क्षेत्र व्यापक होऊ शकेल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

या शहरांसाठी विमानसेवेची प्रतीक्षा ?अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसह पुणे, नागपूर, इंदोर, गोवा, भोपाळ, बोधगया या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, अशी उद्योजक, व्यापारी, पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. कोरोनापूर्वी अहमदाबाद, बंगळुरू, उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होती. परंतु, कोरोना विळख्यात बंद पडलेली ही कनेक्टिव्हिटी अजूनही पूर्ववत झालेली नाही.

उडान योजनेत समावेश व्हावाएकाच शहरासाठी औरंगाबादहून रोज एकापेक्षा जास्त विमानसेवा असल्याने तिकिटांचे दर सध्या नियंत्रणात आहेत, ही चांगली बाब आहे. औरंगाबाद हे केंद्र सरकारच्या उडान योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे विमान कंपन्यांना येथून नव्या सेवा देण्यास जास्त रस नाही.- अक्षय चाबूकस्वार, सदस्य, औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप

विमानसेवा वाढीसाठी पाठपुरावाबंगळुरू आणि अहमदाबादला विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी फ्लायबिग आणि एअर इंडियाकडे करण्यात आली आहे. या शहरांना प्रारंभी आठवड्यातून काही दिवसही चालविता येईल. पुणे, उदयपूर विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उदयपूरची विमानसेवा हिवाळ्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. आकासा एअरलाइन्सच्या विमानसेवेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.-सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ