शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत

By बापू सोळुंके | Updated: June 25, 2024 18:18 IST

समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: आंतरवाली सराटी येथील आंदोलनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याच्या कारणावरून डॉ. रमेश तारख यांना काळे फासण्याची घटना वाईट आहे. या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम झालं, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी नोंदविली. मोठ्या पोलीस बंदोस्तात आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत ते आंतरवाली सराटीला रवाना झाले.

१३ जुनपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली झाल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते आंतरवाली सराटीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या घटनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनला गालबोट लावण्याचं काम झाले. हे डॉ. तारख यांनाही माहिती आहे. तारख यांनी गावातल्या आंदोलनाला विरोध केला होता, त्यावर आपल्याला बोलायचं नाही. आपण बेधडक स्वभावाचे आहोत, असले प्रकार आपल्याला आवडत नाही. समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये. आपल्या आजूबाजुला संपूर्ण समाज वावरतो, यामुळे माझ्या जवळून गेल्यावर कोण काय करते हे आपल्याला माहिती नसते. पण जे झालं ते योग्य नाही, असे काळं फासण्याच्या घटनेवर जरांगे यांनी आवर्जून सांगितले. 

आज गावी जाताना तुमचा पोलीस बंदोबस्त का वाढविला या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, येवलावाल्यांनी तलवारी काढण्याची भाषा केली आहे, याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असेल, यामुळेच बंदोबस्त दिला असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. मंत्री छगन भुजबळ यांनी जातीवाद वाढविल्याचा पुनरूच्चार जरांगे यांनी केला. मात्र मंत्री शंभूराजे देसाई यांनी १३ जुलैपर्यंत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बोलू नये,असे आवाहन केल्याने आपण बोलणार नसल्याचे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे मी जसा अंतरवालीला जातो तसा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर नेते गाव खेड्यातल्या ओबीसी समाजाला विरोधक मानलं नाही आणि मानणार नसल्याचे जरांगे म्हणाले.

जुलैमध्ये पुढील दिशा६ ते १३ जुलै दरम्यानमराठा समाज जागृत करण्यासाठी नियोजन केले आहे. आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आंदोलन उभ करण्यासाठी आयुष्य घालवलं आहे. यामुळे यावर कोणी बोललं त्याला उत्तर दिलेच पाहजे असे नाही. मराठा समाजाच्या ३-४ पिढ्या यात गेल्याचे त्यांनी सांगितले.-----------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद