शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत

By बापू सोळुंके | Updated: June 25, 2024 18:18 IST

समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर: आंतरवाली सराटी येथील आंदोलनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्याच्या कारणावरून डॉ. रमेश तारख यांना काळे फासण्याची घटना वाईट आहे. या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम झालं, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी नोंदविली. मोठ्या पोलीस बंदोस्तात आणि मराठा कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत ते आंतरवाली सराटीला रवाना झाले.

१३ जुनपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चांगली झाल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते आंतरवाली सराटीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कालच्या घटनेने मराठा आरक्षणाच्या आंदोलनला गालबोट लावण्याचं काम झाले. हे डॉ. तारख यांनाही माहिती आहे. तारख यांनी गावातल्या आंदोलनाला विरोध केला होता, त्यावर आपल्याला बोलायचं नाही. आपण बेधडक स्वभावाचे आहोत, असले प्रकार आपल्याला आवडत नाही. समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये. आपल्या आजूबाजुला संपूर्ण समाज वावरतो, यामुळे माझ्या जवळून गेल्यावर कोण काय करते हे आपल्याला माहिती नसते. पण जे झालं ते योग्य नाही, असे काळं फासण्याच्या घटनेवर जरांगे यांनी आवर्जून सांगितले. 

आज गावी जाताना तुमचा पोलीस बंदोबस्त का वाढविला या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, येवलावाल्यांनी तलवारी काढण्याची भाषा केली आहे, याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असेल, यामुळेच बंदोबस्त दिला असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. मंत्री छगन भुजबळ यांनी जातीवाद वाढविल्याचा पुनरूच्चार जरांगे यांनी केला. मात्र मंत्री शंभूराजे देसाई यांनी १३ जुलैपर्यंत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी बोलू नये,असे आवाहन केल्याने आपण बोलणार नसल्याचे ते म्हणाले. नेहमीप्रमाणे मी जसा अंतरवालीला जातो तसा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर नेते गाव खेड्यातल्या ओबीसी समाजाला विरोधक मानलं नाही आणि मानणार नसल्याचे जरांगे म्हणाले.

जुलैमध्ये पुढील दिशा६ ते १३ जुलै दरम्यानमराठा समाज जागृत करण्यासाठी नियोजन केले आहे. आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आंदोलन उभ करण्यासाठी आयुष्य घालवलं आहे. यामुळे यावर कोणी बोललं त्याला उत्तर दिलेच पाहजे असे नाही. मराठा समाजाच्या ३-४ पिढ्या यात गेल्याचे त्यांनी सांगितले.-----------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद