शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन

By विकास राऊत | Updated: April 5, 2023 20:13 IST

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाही तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात असून, गेल्या ९० दिवसांत विभागात २१४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या विभागात होत असल्याचे प्रमाण आहे.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६५ आत्महत्या झाल्या. सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त व्याज घेणाऱ्या सावकारांकडे हात पसरावे लागतात.

चार वर्षांपासून अतिवृष्टीमराठवाड्यात चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याबीड जिल्ह्यात गेल्या ९० दिवसांत ६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

आता प्रशासन करणार सर्व्हे.....मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक स्थितीची आगामी काळात उकल व्हावी, यासाठी ग्रामविकास, कृषी आणि महसूल प्रशासन सर्वेक्षण करणार आहे. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. सावकारी कर्ज, नापिकी, अतिवृष्टी, मानसिक ताणासह इतर अनेक नैराश्यांचा सामना शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सहा पानी प्रश्नावलींतून सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेच्या विश्लेषणाअंती उपाययोजनांवर प्रशासन तज्ज्ञांशी चर्चा करून पुढे जाणार आहे. या सर्व्हेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील दीड हजारांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नवीन वर्षांतील ९० दिवसांत २१४ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर : २३जालना : १५परभणी : १८हिंगोली : ०५नांदेड : ३१बीड : ६५लातूर : १४धाराशिव : ४३एकूण : २१४ 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरी