शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'सावकाराचा जाच,अवकाळीमुळे हतबलता'; मराठवाड्यात रोज दोन शेतकरी संपवतात जीवन

By विकास राऊत | Updated: April 5, 2023 20:13 IST

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. खताला जीएसटी लावून सबसिडी कपात केली. कापसाला भाव मिळत नाही तर हरभरा खरेदी करण्याबाबत निर्णय नाही. सोयाबीनने फटका दिला. यामुळे शेतकरी प्रचंड नैराश्यात असून, गेल्या ९० दिवसांत विभागात २१४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. रोज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या विभागात होत असल्याचे प्रमाण आहे.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या ९० दिवसांत २१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ६५ आत्महत्या झाल्या. सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी, अतिवृष्टीमुळे हातून गेलेले पीक, सरकारकडून मिळत नसलेली मदत ही कारणे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढविण्यासाठी पोषक ठरत असल्याचे बोलले जाते. विभागात बँकांकडून मिळणारे पीककर्ज सरसकट मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त व्याज घेणाऱ्या सावकारांकडे हात पसरावे लागतात.

चार वर्षांपासून अतिवृष्टीमराठवाड्यात चार वर्षांपासून अतिवृष्टी होत असून, यामध्ये खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक नुकसान दरवर्षी झाले आहे. शेतकरी आत्महत्या वाढीमागे हेदेखील कारण आहे. भरपाईसाठी चार वर्षांत १२ हजार कोटींच्या आसपास मदतनिधी शासनाने दिला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याबीड जिल्ह्यात गेल्या ९० दिवसांत ६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्यात ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

आता प्रशासन करणार सर्व्हे.....मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, कौटुंबिक स्थितीची आगामी काळात उकल व्हावी, यासाठी ग्रामविकास, कृषी आणि महसूल प्रशासन सर्वेक्षण करणार आहे. विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. सावकारी कर्ज, नापिकी, अतिवृष्टी, मानसिक ताणासह इतर अनेक नैराश्यांचा सामना शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सहा पानी प्रश्नावलींतून सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेच्या विश्लेषणाअंती उपाययोजनांवर प्रशासन तज्ज्ञांशी चर्चा करून पुढे जाणार आहे. या सर्व्हेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील दीड हजारांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नवीन वर्षांतील ९० दिवसांत २१४ आत्महत्याछत्रपती संभाजीनगर : २३जालना : १५परभणी : १८हिंगोली : ०५नांदेड : ३१बीड : ६५लातूर : १४धाराशिव : ४३एकूण : २१४ 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरी