शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया

By संतोष हिरेमठ | Updated: December 22, 2022 14:31 IST

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा : खा. अमोल कोल्हे

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा, तो प्रत्येक काळजावर कोरला जावा, या हेतूने औरंगाबादेत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. अडीच तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून तर बलिदानापर्यंतचा धगधगता इतिहास मांडला येईल. भव्य रंगमंच, दिग्गज आणि स्थानिक असे १५० कलावंत, बैलगाड्या, तडाखेबाज संवाद, तोफा, लढाया, आतषबाजी, प्रेक्षकांमधून घोड्यावरून प्रवेश, रंगमंचावर येणारे २० फुटी जहाज या सगळ्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर इतिहास कोरणारे हे महानाट्य आहे, असे अभिनेते खा. अमोल कोल्हे म्हणाले.

औरंगाबादेत २३ ते २८ डिसेंबरदरम्यान जबिंदा मैदानावर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त डाॅ. अमोल कोल्हे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डाॅ. कोल्हे म्हणाले, आजकाल शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दिवसेंदिवस कमी होत आहे. आत्मसन्मान शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने आपला इतिहास, संस्कृती माहिती असणे आवश्यक असते.

काय आहे महानाट्य?कोल्हे म्हणाले, औरंगाबादेत २०१२ मध्ये हे महानाट्य झाले होते. महानाट्यात केवळ मनोरंजन हा भाग नाही. हा एक संस्कार आहे. आपल्या मातीचा, आपल्या राज्याचा, आपल्या राष्ट्राचा अभिमान हा मनात जागृत होणे गरजेचे आहे. आजकाल पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. दृकश्राव्य माध्यमे म्हणजे मालिका, चित्रपट किंवा अशा महानाट्यातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.

महानाट्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडमहानाट्याच्या सादरीकरणात एलईडी स्क्रीन, इलेक्ट्रिकल आतषबाजी, अत्याधुनिक लाईट्स आहे. जंजिरा मोहिमेच्या प्रसंगात २० फुटांचे जहाज रंगभूमीवर येते. त्या वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्राचा अनोखा इफेक्ट पाहायला मिळेल.

४ मजली सेट, १२ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्थाकोल्हे म्हणाले, जबिंदा मैदानावर जवळपास ४ मजली सेट आहे. १० ते १२ हजार प्रेक्षक बसतील, अशी व्यवस्था आहे. महानाट्य म्हटले की, आज एक भाग, उद्या दुसरा भाग, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र तसे नसून दररोज पूर्ण प्रयोग होणार आहे. किमान ६० हजार नागरिक हे महानाट्य पाहतील. पहिल्या दिवशी सावली अनाथाश्रमातील ७२ बालके स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहतील. अनेक स्थानिक कलावंत २०१२ पासून या महानाट्याचा भाग आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद