शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास महानाट्यातून; रंगमंचावर १५० कलावंत, २० फुटी जहाज अन् लढाया

By संतोष हिरेमठ | Updated: December 22, 2022 14:31 IST

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा : खा. अमोल कोल्हे

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचावा, तो प्रत्येक काळजावर कोरला जावा, या हेतूने औरंगाबादेत ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. अडीच तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून तर बलिदानापर्यंतचा धगधगता इतिहास मांडला येईल. भव्य रंगमंच, दिग्गज आणि स्थानिक असे १५० कलावंत, बैलगाड्या, तडाखेबाज संवाद, तोफा, लढाया, आतषबाजी, प्रेक्षकांमधून घोड्यावरून प्रवेश, रंगमंचावर येणारे २० फुटी जहाज या सगळ्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर इतिहास कोरणारे हे महानाट्य आहे, असे अभिनेते खा. अमोल कोल्हे म्हणाले.

औरंगाबादेत २३ ते २८ डिसेंबरदरम्यान जबिंदा मैदानावर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त डाॅ. अमोल कोल्हे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डाॅ. कोल्हे म्हणाले, आजकाल शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दिवसेंदिवस कमी होत आहे. आत्मसन्मान शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने आपला इतिहास, संस्कृती माहिती असणे आवश्यक असते.

काय आहे महानाट्य?कोल्हे म्हणाले, औरंगाबादेत २०१२ मध्ये हे महानाट्य झाले होते. महानाट्यात केवळ मनोरंजन हा भाग नाही. हा एक संस्कार आहे. आपल्या मातीचा, आपल्या राज्याचा, आपल्या राष्ट्राचा अभिमान हा मनात जागृत होणे गरजेचे आहे. आजकाल पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. दृकश्राव्य माध्यमे म्हणजे मालिका, चित्रपट किंवा अशा महानाट्यातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.

महानाट्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोडमहानाट्याच्या सादरीकरणात एलईडी स्क्रीन, इलेक्ट्रिकल आतषबाजी, अत्याधुनिक लाईट्स आहे. जंजिरा मोहिमेच्या प्रसंगात २० फुटांचे जहाज रंगभूमीवर येते. त्या वेळी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समुद्राचा अनोखा इफेक्ट पाहायला मिळेल.

४ मजली सेट, १२ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्थाकोल्हे म्हणाले, जबिंदा मैदानावर जवळपास ४ मजली सेट आहे. १० ते १२ हजार प्रेक्षक बसतील, अशी व्यवस्था आहे. महानाट्य म्हटले की, आज एक भाग, उद्या दुसरा भाग, असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र तसे नसून दररोज पूर्ण प्रयोग होणार आहे. किमान ६० हजार नागरिक हे महानाट्य पाहतील. पहिल्या दिवशी सावली अनाथाश्रमातील ७२ बालके स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहतील. अनेक स्थानिक कलावंत २०१२ पासून या महानाट्याचा भाग आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद