शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

पावसाअभावी मराठवाडा मेटाकुटीला; औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत होतोय टँकरने पाणीपुरवठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 5:00 PM

यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे.

ठळक मुद्दे सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे.

औरंगाबाद : सरकार दरबारी ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात विभागात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन अर्ध्याहून कमी होणार आहे. सर्व मोठ्या प्रकल्पांत ३८ टक्के जलसाठा आहे. सर्व बाजूंनी विभाग मेटाकुटीला आला असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पुढील वर्षीचा उन्हाळा मराठवाड्यासाठी अतिशय भयावह ठरण्याची चिन्हे आहेत. २०१२ नंतर २०१५ सारख्या परिस्थितीचा सामना विभागाला करावा लागण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेले औरंगाबाद शहर व जिल्ह्यात १५५ टँकरने १४५ गावांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. जालना जिल्ह्यात २१ टँकरने १५ गावांत पाणीपुरवठा होतो आहे. १८१ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. १६ विहिरींची त्यात वाढ झाली आहे. २२ गावे नव्याने टंचाईच्या यादीत आली आहेत. पावसाळ्यात अशी परिस्थिती असल्यामुळे पुढील काही महिन्यांत काय होईल, हे सांगणे अवघड आहे. ६३.४२ टक्क्यांवर मराठवाड्यातील पाऊस थांबला आहे. १ महिन्याचा खंड पडल्यामुळे विभागात टंचाई वाढली आहे. १०० टक्के पाऊस होणे अपेक्षित होते. ३७ टक्के पावसाचा खंड पडला आहे. किमान सरासरीच्या तुलनेत ८१ टक्के तरी पाऊस होणे अपेक्षित होते. 

पावसाळ्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यात आजवर ६३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजवर सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. मार्चमध्ये १५५ आत्महत्यांची नोंद होती. जून महिन्यात तो आकडा ४३३ वर गेला. जुलै महिन्यात ५२७ वर आत्महत्यांची नोंद झाली, तर सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेपर्यंत ६१८ आत्महत्यांचा अहवाल शासनाकडे विभागीय आयुक्तालयाने पाठविला होता. २५ सप्टेंबरपर्यंत ६३६ आत्महत्यांची नोंद झाली. मागील १२ दिवसांत १८ आत्महत्या विभागात झाल्या. १ जून ते २५ सप्टेंबर या ११७ दिवसांत २०३ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला. पावसाळ्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे आकड्यांवरून दिसते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाचे नुकसान झाले. त्या तणावातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढला. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणी