शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तीसगाव पाझर तलावातील पाण्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 6:43 PM

तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले.

ठळक मुद्देतीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

वाळूज महानगर: तीसागव पाझर तलावाच्या पाण्यावर डल्ला मारला जात असल्याचे सोमवारी उघडकीस आले. बिनधास्तपणे विद्युप मोटारी टाकून सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला जात असल्याने या तलावावर अवलंबून असलेल्या तीन गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

तीसगाव पाझर तलावातून तीसगावसह लगतच्या शरणापूर व धरमपूर या तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचे इतर स्त्रोत नसल्याने ही तीनही गावे याच पाण्यावर अवलंबून आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तलावात अत्यल्प जलसाठा आहे. परिसरातील शेतकरी व जनावरासाठी हा तलाव एकमेव जलस्त्रोत आहे. अत्यल्प पाऊस आणि उन्हाचा पारा पाहता दिवसेंदिवस तलावातील पाणी पातळी खालावत आहे.

केवळ दीड-दोन महिने नागरिकांना पाणी पुरेल एवढाच जलसाठा आहे. बोअर व विहिरीनेही तळ गाठला आहे. परंतू काही दिवसांपासून तीसगावसह शरणापूर, धरमपूर, मीटमीटा परिसरातील काही शेतकरी तलावातील पाण्याचा वापर सिंचनासाठी करीत असल्याचे आढळून आले आहे. शरणापूर ग्रामपंचायतीच्या शासकीय विहीरीलगत अनेकांनी तलावाच्या चारीत विद्युत मोटारी टाकून बिनदिक्कतपणे पाण्याचा उपसा सुरु केला आहे. विशेष म्हणजे या मोटारींना आकडे टाकून वीज जोडणी घेण्यात आली आहे. या भागात जवळपास १० ते १२ विद्युत मोटारी लावून दिवस-रात्र लाखो लिटर पाण्याची चोरी केली जात आहे. पाणीचोरी कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून झाडा-झुडपात अडचणीच्या ठिकाणी या मोटारी बसविण्यात आल्या आहेत. हा प्रकार माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे व ग्रा.पं. सदस्य संजय जाधव यांनी उघडकीस आणला आहे.

तीन गावांवर टंचाईचे संकटतीसगाव, शरणापूर व धरमपूर या तीन गावांना दीड-दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा तलावात आहे. यातून पाणीचोरी सुरुच राहिल्यास हा तलाव अल्पावधीतच कोरडा पडण्याची शक्यता आहे. जलसाठा संपुष्टात आल्यानंतर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणारनागरिकांना दीड-दोन महिने पुरेल एवढेच पाणी तलावात शिल्लक आहे. यावरच गावची तहान भागते. विद्युत मोटारी टाकून तलावातील पाण्याचा उपसा केला जात असल्याने येणाºया काळात नागरिकांना प्यायला पाणी मिळणार नाही. पाणीचोरी रोखण्यासाठी ग्रामपंचायत मंगळवारी जिल्हाधिका-यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संरपच कौशल्याबाई कसुरे व ग्रामविकस अधिकारी अशोक गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादtheftचोरी