शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांना त्रासच त्रास!

By admin | Updated: July 24, 2014 00:38 IST

औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत.

औरंगाबाद : महापालिकेला प्रामाणिकपणे मालमत्ता, पाणीपट्टी आदी कर देणारे नागरिक भरपूर आहेत. त्यांच्या आर्थिक साह्यामुळे मनपाच्या आर्थिक संकटाला थोडाफार हातभार लागतो; पण करदात्यांना त्रास देण्याचे प्रशासनाने सुरू केले आहे की काय? एखाद्या रस्त्याकडे किती वर्षे दुर्लक्ष करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.संस्थान गणपतीशहराचे आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपतीसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. वाहनधारकांसह पायी ये-जा करणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून महापालिकेने या रस्त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. सकाळी, सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. जुन्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. महापालिकेला कर भरूनही खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली. काहींनी तर मनपाला कर भरणेच बंद करावे लागेल, असे नमूद केले. विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या सत्तेचा ‘रिमोट’ ज्यांच्या हातात आहे, ते नेतेही दर्शनासाठी अधूनमधून येतात. त्यांना हा खराब रस्ता दिसत नाही का असा प्रश्न काही सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला.बारुदगरनाला ते औरंगपुराशहराच्या कोणत्याही भागात राहणारा नागरिक औरंगपुरा भाजीमंडईत खरेदीसाठी येतच असतो. भाजीमंडईकडे येणारा एक रस्ता म्हणजे बारुदगरनाला ते सुराणा अपार्टमेंट होय. हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून मनपाने दुरुस्त केलेला नाही. यापूर्वी एकदा डागडुजी करण्यात आली होती. सध्या रस्त्यात ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वीच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्री तर या खड्ड्यांमध्ये चारचाकी आणि रिक्षाचालक हमखास अडकून पडतात. आसपास राहणाऱ्या नागरिकांना वाहन बाहेर काढण्यासाठी मदतीला बोलावण्यात येते. मागील आठ दिवसांपासून तर हे प्रकार खूपच वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मोंढा ते अंगुरीबाग शहरातील अत्यंत जुनी बाजारपेठ असलेल्या मोंढा ते अंगुरीबाग रस्ताही वाहनधारकांच्या अंगाला काटा आणणारा आहे. मागील अनेक वर्षांमध्ये या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी डागडुजी प्रामाणिकपणे केली जाते. हा रस्ता गुळगुळीत करण्यात यावा, रस्त्यावर पाणी थांबणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी व्यापाऱ्यांसह रहिवाशांची अपेक्षा आहे. महापालिकेने आतापासूनच या रस्त्याचा विचार केल्यास गणेशोत्सवापूर्वी रस्ता तयार होईल. या भागातील व्यापारी, सर्वसामान्य नागरिक दरवर्षी मनपाला शंभर टक्के कर भरतात. करदात्यांनाच त्रास देण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने स्वीकारल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. या भागातील लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.