शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट तक्रारींची दखल घ्या

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़

परभणी : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन बँकांनी या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केल्या आहेत़
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, रोहयो, पाणीटंचाई व विकासकामांची आढावा बैठक १० जुलै रोजी जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ एस़ डुंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते़ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती़ या गारपिटीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही़ या तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी वरील आदेश दिले़ तसेच सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत शिबिरे घेऊन या कार्यक्रमास गती द्यावी, समाधान योजनेंतर्गत ग्रामस्थांना लाभ द्यावा, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी गावांना भेटी देऊन ग्रामसभा घ्याव्यात व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, त्यांचे निराकरण करावे, मतदान केंद्र व मतदान यादी बाबतच्या स्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या़ (प्रतिनिधी)
टंचाईचे आराखडे तयार ठेवा
यावर्षी मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यामुळे पाऊस लांबला आहे़ त्यामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ अशी स्थिती निर्माण झाल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी टंचाई आराखडे तयार ठेवावेत़ टंचाई उद्भवेल अशा गावांमध्ये रोहयो कामांचे प्राधान्याने नियोजन करावे, रोहयोचे प्रलंबित हजेरीपट त्वरित तयार करावे, असे निर्देश जयस्वाल यांनी दिले़ दरम्यान, ९ जुलैअखेर ६८़४१ मिमी पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात टँकर सुरू नाहीत़ टंचाई उद्भवू शकणाऱ्या गावे व तांड्यांसाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून, पाणीटंचाई भासू नये, यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़