शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी सहकार्य

By admin | Updated: July 13, 2014 00:24 IST

उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल,

उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.तालुक्यातील बिजेगाव येथील पुनर्वसनाच्या घरबांधकामाची जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पाहणी केली. यावेळी आ. वसंतराव चव्हाण, भूसंपादन अधिकारी मोतीयाळे, उपविभागगीय अधिकारी धरमकर, तहसीलदार टी. ए. जाधव, गोविंदराव सिंधीकर, गटविकास अधिकारी व्ही. आर. कोंडेकर, नायब तहसीलदार जाधव, जीवन प्राधीकरण, सार्वजनिक बांधकाम, कृषी आदी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. बांधकाम पूर्ण झालेल्यांपैकी काही घरे नादुरुस्त झाली. फरशी फुटली, घरात खड्डे पडले, खडकावर बांधकाम झाल्याने काही घरात खडक जैसे थे आहे. दारे, खिडक्या गंजून खराब झाली व मोडकळीस आली. गावकऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रकार दाखविला. जी घरे दर्जाहीन आहेत व तेथे मोडतोड झाली तेथे तत्काळ दुरुस्ती करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जेवढे घरे पूर्ण झाली त्या घरात लोकांनी वास्तव्य केल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल होईल व बांधकामासाठी पडलेले व इतर साहित्यांची चोरी होणार नाही. त्यासाठी गावकऱ्यांतून, अधिकारी यांची एक स्थानिक समिती बनविण्यात यावी.समितीने केलेल्या सुचनेनुसार प्रशासन योग्य निर्णय घेईल. पर्यायाने बिजेगावचे गेल्या सहा वर्षांपासून रेंगाळलेले पुनर्वसनाचे काम सर्व सुविधांसह दर्जेदार पूर्ण होईल. त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे. कामाच्या दर्जाबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. प्रास्ताविक उपसरपंच दत्तात्रेय बिजेगावकर यांनी केले. (वार्ताहर)उमरीत २२० घरकुले पूर्णबिजेगाव येथील पुनर्वसनाचे काम सन २००८ साली सुरु झाले. एकूण २७४ घरांचे बांधकाम, अंगणवाडी, शाळा, रस्ते, विद्युत व्यवस्था, पाण्याची टाकी आदी कामांचा यात समावेश आहे. सध्या २७४ पैकी २२० घरांचे बांधकाम पूर्णत्वास आले. पुनर्वसनात बांधण्यात येणाऱ्या घरांचा एकूण अंदाजित खर्च ८.५ कोटी एवढा आहे. विविध कारणांमुळे रेंगाळलेले बांधकाम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांतून होत आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.