शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

डी.एड.कडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

By admin | Updated: June 23, 2014 00:26 IST

जालना : गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी डी.एड. अभ्याक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.

जालना : गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी डी.एड. अभ्याक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येत असून, जिल्ह्यात उपलब्ध ९५० जागांसाठी केवळ २८१ विद्यार्थ्यांचेच अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने (डाएट) २ जूनपासून यावर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. १६ जूनपर्यंत ही प्रवेशाची अंतिम तारीख होती. या मुदतीत शेवटच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात ९५० प्रवेशक्षमता असताना फक्त २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जिल्ह्यात एकूण १३ अध्यापक विद्यालय आहेत. त्यापैकी १ शासकीय तर १२ विद्यालय खाजगी विनाअनुदानित आहेत. त्यामध्ये जालना तालुक्यात-४, घनसावंगी-१, परतूर-२, मंठा-३, भोकरदन तालुक्यात २ असे एकूण १३ अध्यापक विद्यालय आहेत.शासनाने १९९० पासून विनाअनुदानित तत्त्वावर राज्यभरात डी.एड.च्या अनेक महाविद्यालयांना मान्यता दिली. या कॉलेजमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत होते. त्यामुळे डी.एड. प्रशिक्षणार्थ्यांची संख्या भरमसाठ वाढली. परिणामी, शाळेतील दोन ते चार जााांसाठी शेकडो उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू लागले. जिल्ह्यात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून हजारो डी.एड.धारक विद्यार्थी नोकरीपासून वंचित आहेत. सध्या तर अनेक शिक्षक पटपडताळणीदरम्यान अतिरिक्त ठरल्यामुळे समायोजनासाठी प्रक्रिया जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे. परिणामी, राज्य शासनाने अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकभरती तूर्तास थांबविली आहे. फक्त विनाअनुदानित शाळेतील शिक्षक भरतीला मान्यता आहे.गेल्या दहा वर्षांत डी.एड. महाविद्यालयाची संख्या वाढली आहे. हजारो उमेदवार डी.एड. होऊन बाहेर पडत आहे. जागा कमी आणि उमेदवार जास्त झाल्याने नोकरीची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे विद्यार्थी डी.एड.कडे येत नसल्याचे ‘डाएट’च्या प्राचार्या डॉ. अचला जडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मानधन नसल्यामुळे शिक्षकही हवालदिलगेल्या सात-आठ वर्षांपासून अनेक डी.एड. प्रशिक्षणार्थी थोड्याफार प्रमाणात खाजगी, विनाअनुदानित शाळेवर कार्यरत आहेत. त्यांना नियमित मानधनही मिळत नसल्याने हे युवक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे डी.एड.कडे उमेदवारांनी पाठ फिरविली आहे.