शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

अधिकाऱ्यांच्या नुसत्याच येरझाऱ्या; विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 20:43 IST

संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुसत्यास या वस्तीला भेट देऊन येरझाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत.

- तारेख शेख

कायगाव : गंगापूर तालुक्यातील गोदावरी आणि शिवना काठावरच्या शेतवस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना जवळीची भिवधानोरा येथील शाळा गाठण्यासाठी आजही थर्माकॉलच्या तराफ्यावरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुसत्यास या वस्तीला भेट देऊन येरझाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत.

गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलीकडे आहे. भिवधानोरा येथील काळे, चव्हाण, घोटकर, लवघळे आदी कुटुंबांसह अनेक शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतवस्त्या या भागांत आहेत. या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी भिवधानोरा या गावातील जिल्हा परिषद शाळा जवळची आहे. या शाळेत नदीपात्रातून आल्यानंतर ४ किलोमीटर अंतर पडते तर रस्त्याने आल्यानंतर १० ते १२ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे या शेतवस्तीवरील मुले शिक्षणासाठी थर्माकॉलच्या तराफ्यावरून १ किलोमीटरचा प्रवास करणे पसंत करतात. त्यानंतर ३ किलोमीटर पायी चालत येऊन जि.प.ची शाळा गाठतात.

या विद्यार्थ्यांचा हा नित्याचा दिनक्रम आहे. सुरुवातीला या विद्यार्थ्यांना याबाबत भीती वाटत होती; परंतु नंतर त्याची या विद्यार्थ्यांना सवय झाली आहे, असे पालक सांगतात. जीव धोक्यात घालून शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचा वृत्तांत ‘लोकमत’ने गतवर्षी १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी अधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आश्वासन दिले; परंतु पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत आजही सुरूच आहे.पूल बांधकामासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च

या प्रश्नावर मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी याठिकाणी पूल तयार करावा लागणार आहे. यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च जलसंपदा विभाग करू शकणार नाही. त्यामुळे यासंदर्भात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून लवकरच योग्य मार्ग काढला जाईल, असे सभागृहात सांगितले होते; मात्र पुढे काही झाले नाही.

शिक्षणाधिकारी चव्हाण झाल्या निरुत्तर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सोमवारी या भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी भिवधानोरा येथील शाळेला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सरकारी वाहनाची व्यवस्था करण्याबाबत किंवा जागेवर वस्तीशाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र उपस्थित पालकांनी ही ऑफर धुडकावून लावली. वस्तीशाळा सुरू करून मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था कराल. मात्र पुढील शिक्षणासाठी होणारी त्यांची दैना थांबेल का, असा सवाल पालकांनी चव्हाण यांना विचारला. त्यावर चव्हाण या निरुत्तर झाल्या. कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्याची या पालकांची मागणी आहे.

फोटो कॅप्शन: गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील गोदावरी नदीपलीकडील विद्यार्थ्यांना असे थर्माकॉलच्या तराफ्यावरून प्रवास करून जवळची जि. प. शाळा गाठावी लागते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी