शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अधिकाऱ्यांच्या नुसत्याच येरझाऱ्या; विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 20:43 IST

संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुसत्यास या वस्तीला भेट देऊन येरझाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत.

- तारेख शेख

कायगाव : गंगापूर तालुक्यातील गोदावरी आणि शिवना काठावरच्या शेतवस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना जवळीची भिवधानोरा येथील शाळा गाठण्यासाठी आजही थर्माकॉलच्या तराफ्यावरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी मात्र याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुसत्यास या वस्तीला भेट देऊन येरझाऱ्या करण्यात धन्यता मानत आहेत.

गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलीकडे आहे. भिवधानोरा येथील काळे, चव्हाण, घोटकर, लवघळे आदी कुटुंबांसह अनेक शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतवस्त्या या भागांत आहेत. या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी भिवधानोरा या गावातील जिल्हा परिषद शाळा जवळची आहे. या शाळेत नदीपात्रातून आल्यानंतर ४ किलोमीटर अंतर पडते तर रस्त्याने आल्यानंतर १० ते १२ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे या शेतवस्तीवरील मुले शिक्षणासाठी थर्माकॉलच्या तराफ्यावरून १ किलोमीटरचा प्रवास करणे पसंत करतात. त्यानंतर ३ किलोमीटर पायी चालत येऊन जि.प.ची शाळा गाठतात.

या विद्यार्थ्यांचा हा नित्याचा दिनक्रम आहे. सुरुवातीला या विद्यार्थ्यांना याबाबत भीती वाटत होती; परंतु नंतर त्याची या विद्यार्थ्यांना सवय झाली आहे, असे पालक सांगतात. जीव धोक्यात घालून शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचा वृत्तांत ‘लोकमत’ने गतवर्षी १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला होता. त्यानंतर तहसीलदार, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आदी अधिकाऱ्यांनी या गावांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची सोय करण्याचे आश्वासन दिले; परंतु पुढे काहीही झाले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत आजही सुरूच आहे.पूल बांधकामासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च

या प्रश्नावर मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न निकाली काढण्यासाठी याठिकाणी पूल तयार करावा लागणार आहे. यासाठी ९० कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च जलसंपदा विभाग करू शकणार नाही. त्यामुळे यासंदर्भात ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करून लवकरच योग्य मार्ग काढला जाईल, असे सभागृहात सांगितले होते; मात्र पुढे काही झाले नाही.

शिक्षणाधिकारी चव्हाण झाल्या निरुत्तर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सोमवारी या भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी भिवधानोरा येथील शाळेला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सरकारी वाहनाची व्यवस्था करण्याबाबत किंवा जागेवर वस्तीशाळा सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र उपस्थित पालकांनी ही ऑफर धुडकावून लावली. वस्तीशाळा सुरू करून मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था कराल. मात्र पुढील शिक्षणासाठी होणारी त्यांची दैना थांबेल का, असा सवाल पालकांनी चव्हाण यांना विचारला. त्यावर चव्हाण या निरुत्तर झाल्या. कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्याची या पालकांची मागणी आहे.

फोटो कॅप्शन: गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारातील गोदावरी नदीपलीकडील विद्यार्थ्यांना असे थर्माकॉलच्या तराफ्यावरून प्रवास करून जवळची जि. प. शाळा गाठावी लागते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थी