शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

मोदींच्या परदेश दौऱ्यांत कलम ३७० साठी रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 7:10 PM

‘अकॅडमिक्स फॉर देवेंद्र’मध्ये भाऊ तोरसेकर यांचे मत 

ठळक मुद्दे पाच वर्षांच्या कार्यकाळात जगातील ७० हून अधिक देशांचे दौरे केले.

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांनी टीका केली असली तरी त्यांचे ते दौरे काश्मिरातील ३७० कलम हटविण्यासाठी रणनीती आखणारे असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी रविवारी व्यक्त केले. 

‘अकॅ डमिक्स फॉर देवेंद्र’ थिंकर्स मीट’ या जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात जगातील ७० हून अधिक देशांचे दौरे केले. त्या दौऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. आता पाकिस्तान एकाकी पडल्यावर लक्षात येते की, मोदी यांनी परदेश दौऱ्यातून काय साध्य केले. त्यांचे दौरे काश्मिरातील ३७० कलम हटविण्यासाठी तयारी असल्याचे यावर्षी स्पष्ट झाले. ३७० कलम हटविल्यावर पाकिस्तानने ओरड केली; परंतु जगभरातील राष्ट्रांनी पाकिस्तानच्या बाजूने कौल दिला नाही. यामागे मोदींची रणनीती असल्याचे तोरसेकर म्हणाले. काश्मिरातील वंचितांची लढाई तेथील लाभार्थी लढवीत होते. हुरियत नेत्यांच्या मुलांचा परदेशातील खर्चही सरकारी तिजोरीतून होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

थिंकर्स मीटमध्ये अनेकांनी केल्या सूचनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक चांगली कामे झाली. यापुढे अनेक चांगली कामे होण्याबाबत मान्यवरांनी आपल्या सूचना ‘अकॅ डमिक्स फॉर देवेंद्र’ या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केल्या. शिक्षण, उद्योग, आंबेडकरी चळवळ, युवा व इतर क्षेत्रांबाबत कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या भल्याचा विचार जरूर करावा. मात्र, त्यांनी मराठवाड्याकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना उल्हास गवळी यांनी केली. मानसिंग पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच्या सरकारप्रमाणे आपली माणसे नेमण्याचा पायंडा पाडू नये. मराठवाड्यात तोडीची माणसे आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी पाहावे. उमेश शर्मा म्हणाले, सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत मर्यादित असून, सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा, तसेच सायबर क्राईम, डिजिटल शिक्षणावर भर द्यावा. बुद्धिवान समाजनिर्मितीसाठी शिक्षणखाते मुख्यमंत्र्यांकडे असले पाहिजे. १९८६ नंतर शैक्षणिक धोरणांवर विशेष असे काम झालेले नाही, असे मत मुनीष शर्मा यांनी मांडले. प्रा.ऋषिकेश कांबळे यांनी सूचना करताना सांगितले, परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या लोकसंख्येवर आधारित असायला हवी. त्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट व्हावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक उमेश दाशरथी आणि डॉ. उन्मेष टाकळकर यांनी केले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारPakistanपाकिस्तान