शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी,घाणेवाडीचा पाणीपुरवठा झाला बंद

By admin | Updated: July 20, 2014 00:30 IST

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे.

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने संप सुरू करून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, नामांतर विभाग, बांधकाम परवानगी देणे इत्यादी कामे बंद आहेत. त्याचप्रमाणे पाच दिवसांमध्ये ज्या भागात सार्वजनिक पाणीपुरवठा होणे आवश्यक होते, अशा जुना जालन्यातील नूतन वसाहत, कचेरी रोड, शंकरनगर, संजयनगर, ओमनगर, देहेडकरवाडी तसेच नवीन जालन्यातील दानाबाजार, गोपिकिशननगर, काद्राबाद व रामनगरचा काही भाग या ठिकाणी पाणीपुरवठा झालेला नाही. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शहरात स्वच्छतेची कामेही बंद आहेत. त्यामुळे मंगळ बाजार, शिवाजी पुतळा, महात्मा फुले मार्केट परिसर, राजमहेल टॉकिज, दे. राजा रोड, शनिमंदिर, नूतन वसाहत, देहेडकरवाडी इत्यादी भागातही कचऱ्याचे ढीग कायम आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकास प्रशासन कार्यालयास नगरपालिकांमधून दररोज जी माहिती द्यावी लागते, ती माहितीदेखील जाणे बंद झाले आहे. (प्रतिनिधी)नगरविकास राज्यमंत्र्यांसमवेत झालेली चर्चा निष्फळदोन दिवसांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेली चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत जिल्ह्यातून डी.आर. खिल्लारे, केशव कानपुडे आदी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून पालिका कार्यालयासमोर धरणे देण्यात येत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत. संपाची धार तीव्र करण्याचा कर्मचारी संघटनेने केला निर्धारशासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरविकास राज्यमंत्री तसेच या खात्याचे सचिव यांच्यासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नगर परिषद कर्मचारी संघटनेने संपाची धार तीव्र करण्यात निर्धार केला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी म्हटले की, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन सेवा पूर्णपणे बंद करणार आहोत. कानपुडे म्हणाले की, यापूर्वी २००६ मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १६ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर दीर्घकाळ संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.