शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा पुतळा : मनपाने नाही, तर बाजार समितीने करून दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:25 IST

एक कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अडीच वर्षे कधी निघून गेले

ठळक मुद्देअडीच वर्षांनंतरही महापालिकेच्या पुतळा उभारणीच्या कामात प्रगती नाहीकृषी उत्पन्न बाजार समितीने सहा महिन्यांत पुतळा उभारून लोकार्पणही केले. 

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा क्रांतीचौक येथे नवीन पद्धतीने उभारण्याचा निर्णय तब्बल अडीच वर्षांपूर्वी औरंगाबाद महापालिकेने घेतला होता. मागील अडीच वर्षांमध्ये महापालिकेला पुतळ्याच्या कामात किंचितही प्रगती करता आलेली नाही. त्यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिकेला जे जमले नाही ते औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने अवघ्या सहा महिन्यांमध्ये करून दाखविले. सहा महिन्यांत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून मागील महिन्यात त्याचे लोकार्पणही करण्यात आले. 

क्रांतीचौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली दिसू लागला. तेव्हापासून शिवप्रेमींनी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी लावून धरली होती. तीन वर्षांपूर्वी शहरातील शिवप्रेमींसह मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन महापौरांना घेराव घातला होता. महापालिकेकडे निधी नसेल तर तसे सांगून टाकावे शिवप्रेमी स्वत:च्या खिशातील पैसे लावून पुतळ्याची उंची वाढवतील, असेही सांगण्यात आले होते. त्यावेळी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी हा विषय अस्मितेचा समजून महापालिका स्वत: पैसा खर्च करेल, असे आश्वासन दिले होते. पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. कंत्राटदार निश्चित करण्यात आला. मोठा गाजावाजा करीत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी भूमिपूजनही केले. मात्र, त्यानंतर कामामध्ये कोणतीही प्रगती दिसून आली नाही. एकीकडे कंत्राटदार काम करण्यास तयार नाही, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन बसवण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. नवीन पुतळ्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 

एक कोटी रुपये खर्च करून नवीन पुतळा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्व प्रक्रियेत अडीच वर्षे कधी निघून गेले, हे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनाही कळाले नाही. मागील आठवड्यात मराठा क्रांती मोर्चा आणि शहरातील शिवप्रेमींनी पुन्हा एकदा महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला. पुतळ्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार, असा जाब विचारण्यात आला. त्यानंतर महापालिकेला जाग आली. कंत्राटदाराला वेळोवेळी बिल अदा करण्याचे आश्वासन देऊन कामाला सुरुवात करण्यात आली.

निर्णय वेळोवेळी बदलले, निधीची कमतरताछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाला अडीच वर्षे पूर्ण झाले, ही वस्तुस्थिती आहे. कामास विलंब होण्यास अनेक कारणे आहेत. या कामामध्ये वेळोवेळी निर्णय बदलत गेले. त्याचप्रमाणे महापालिकेत निधीची कमतरता होती. आता कोणताही अडथळा या कामात येणार नाही. काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल.  - एस.डी. पानझडे, शहर अभियंता, महापालिका. 

असे झाले बाजार  समितीत कामशिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी संचालक मंडळाने डिसेंबर २०१८ ला निर्णय घेतला. १७ मे २०१९ रोजी पुतळा बनविण्यासाठी शिल्पकाराला आॅर्डर दिली. १० जून २०१९ रोजी राज्य सरकारच्या परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केला. कला संचालनालयाची  ९ डिसेंबर १९ रोजी परवानगी मिळाली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९  रोजी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनादेखील मंजुरीसाठी प्रस्ताव दिला. राज्य शासनाची परवानगी १० जून २०२० रोजी मिळाली. लॉकडाऊनमुळे या कामाला जवळपास ४ महिने उशीर झाला. - राधाकिसन पठाडे, (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.) 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkranti chowkक्रांती चौकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका