शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार अल्पमतातलेच

By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST

औरंगाबाद : राज्यातील भाजपा सरकार अल्पमतातले असून, ते असंवैधानिक असल्याचा आक्षेप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतला.

औरंगाबाद : राज्यातील भाजपा सरकार अल्पमतातले असून, ते असंवैधानिक असल्याचा आक्षेप आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतला. दुष्काळ परिषद संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, १२२ च्या वर या सरकारला कोणत्या व किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या सरकारने विश्वास प्रस्ताव संमत करून घेतला पाहिजे. कोणतेही सरकार घटनेची पायमल्ली करणारे नसावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालावे, ही अपेक्षा आहे. हे अल्प मतातले सरकार चालता कामा नये. यासाठी आम्ही राज्यपाल, राष्ट्रपती आणि उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुख्यमंत्री बहुजन असायला हवा होता, या एकनाथ खडसे यांच्या मताशी आपण सहमत आहात का, असे विचारले असता ठाकरे उत्तरले की, शेवटी मुख्यमंत्री कुणाला करावयाचे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न होता; परंतु भाजपावर आरएसएसचा रिमोट कंट्रोल चालतो, हे काही लपून राहिलेले नाही. ज्याने जास्त दिवस चड्डी घातली त्याला त्यांनी मुख्यमंत्री बनविले. एकनाथ खडसे यांनी कदाचित फडणवीस यांच्यापेक्षा कमी दिवस चड्डी घातलेली असावी. एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतीत गेलेले नाहीत. त्यांना शेतीतले ते काय कळणार? म्हणूनच ते पाण्याचा दुष्काळ नाही, असे म्हणू शकतात.सरकारच असे म्हणू लागल्यानंतर लोकांनी पाहावे तरी कुणाकडे? आणि साडेचार हजार कोटी रुपये हे कितीतरी कमी ठरणार आहेत. त्यासाठीही केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे. कोरडवाहू शेतकऱ्यास २५ हजार रुपये व फळबागांसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.