शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

By योगेश पायघन | Updated: March 1, 2023 18:28 IST

गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा...

छत्रपती संभाजीनगर :दहावीच्या गुणांमध्ये गैरमार्गाने मिळविलेला फुगवटा पुढील शैक्षणिक व आर्थिक नुकसान देणारा ठरेल, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या. विद्यार्थ्यांना प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे न्या, गैरमार्गापासून रोखा. निर्भय वातावरणात परीक्षा पार पाडण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक अनिल साबळे यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. गुरुवारपासून विभागातील ६२९ केंद्रांवर १.८० लाख विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्याच्या तयारीची लगबग शाळांसह, बोर्डात बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती.

बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नांदेड पॅटर्ननुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर सुरू होत असलेल्या लेखी परीक्षेत २,६१४ शाळांतील ९९ हजार ५४९ विद्यार्थी तसेच ८० हजार ६६१ विद्यार्थिनी असे एकूण १ लाख ८० हजार २१० परीक्षार्थी ६२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. गुरुवारपासून सुरू होणारी ही परीक्षा २५ मार्चपर्यंत असेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, झडती आणि गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शाळा, परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. दहावीतील गुणांच्या फुगवट्याने पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही पर्यवेक्षकांना करण्यात आल्या आहेत.

जि. प. अधिकाऱ्यांसह महसूलच्या पथकांची नजरकाॅपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षेसाठीची जय्यत तयारी विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना संपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या १० पथकांची नजर परीक्षेवर असणार आहे. परीक्षेच्या आधी एक तास व परीक्षेनंंतर एक तास सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास विभागीय सचिव विजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.

...तर पर्यवेक्षक अन् केंद्रप्रमुखांवरही कारवाईजिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची १० भरारी पथके, जिल्ह्यातील १७ संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके, शिक्षण विभागाची ६ भरारी पथके तसेच महिलांची २ स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत गैरप्रकार घडू नये, त्यासाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडणे, झडती घेऊनच परीक्षार्थ्यांना प्रवेश आणि केंद्रावर गैरप्रकार झाल्यास पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची जाणीव सर्व केंद्रप्रमुखांना करून दिली आहे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

विभागीय मंडळातील जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा - परीक्षा केंद्र - विद्यार्थी - विद्यार्थिनी - एकूण परीक्षार्थीछत्रपती संभाजीनगर - २२७ - ३५३२९ - २९२६४ - ६४५९३बीड - १५६ -२३७६४ - १७१५७ - ४१५२१जालना - ९३ - १५२०३ - १२५९७ - २७८००परभणी - १०० - १६९४३ - १३७४२ - ३०६७६हिंगोली - ५३ - ८३१९ - ७३०१ - १५६२०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावीEducationशिक्षण