शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

By योगेश पायघन | Updated: March 1, 2023 18:28 IST

गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा...

छत्रपती संभाजीनगर :दहावीच्या गुणांमध्ये गैरमार्गाने मिळविलेला फुगवटा पुढील शैक्षणिक व आर्थिक नुकसान देणारा ठरेल, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या. विद्यार्थ्यांना प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे न्या, गैरमार्गापासून रोखा. निर्भय वातावरणात परीक्षा पार पाडण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक अनिल साबळे यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. गुरुवारपासून विभागातील ६२९ केंद्रांवर १.८० लाख विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्याच्या तयारीची लगबग शाळांसह, बोर्डात बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती.

बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नांदेड पॅटर्ननुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर सुरू होत असलेल्या लेखी परीक्षेत २,६१४ शाळांतील ९९ हजार ५४९ विद्यार्थी तसेच ८० हजार ६६१ विद्यार्थिनी असे एकूण १ लाख ८० हजार २१० परीक्षार्थी ६२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. गुरुवारपासून सुरू होणारी ही परीक्षा २५ मार्चपर्यंत असेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, झडती आणि गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शाळा, परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. दहावीतील गुणांच्या फुगवट्याने पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही पर्यवेक्षकांना करण्यात आल्या आहेत.

जि. प. अधिकाऱ्यांसह महसूलच्या पथकांची नजरकाॅपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षेसाठीची जय्यत तयारी विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना संपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या १० पथकांची नजर परीक्षेवर असणार आहे. परीक्षेच्या आधी एक तास व परीक्षेनंंतर एक तास सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास विभागीय सचिव विजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.

...तर पर्यवेक्षक अन् केंद्रप्रमुखांवरही कारवाईजिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची १० भरारी पथके, जिल्ह्यातील १७ संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके, शिक्षण विभागाची ६ भरारी पथके तसेच महिलांची २ स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत गैरप्रकार घडू नये, त्यासाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडणे, झडती घेऊनच परीक्षार्थ्यांना प्रवेश आणि केंद्रावर गैरप्रकार झाल्यास पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची जाणीव सर्व केंद्रप्रमुखांना करून दिली आहे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

विभागीय मंडळातील जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा - परीक्षा केंद्र - विद्यार्थी - विद्यार्थिनी - एकूण परीक्षार्थीछत्रपती संभाजीनगर - २२७ - ३५३२९ - २९२६४ - ६४५९३बीड - १५६ -२३७६४ - १७१५७ - ४१५२१जालना - ९३ - १५२०३ - १२५९७ - २७८००परभणी - १०० - १६९४३ - १३७४२ - ३०६७६हिंगोली - ५३ - ८३१९ - ७३०१ - १५६२०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावीEducationशिक्षण