शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

By योगेश पायघन | Updated: March 1, 2023 18:28 IST

गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा...

छत्रपती संभाजीनगर :दहावीच्या गुणांमध्ये गैरमार्गाने मिळविलेला फुगवटा पुढील शैक्षणिक व आर्थिक नुकसान देणारा ठरेल, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या. विद्यार्थ्यांना प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे न्या, गैरमार्गापासून रोखा. निर्भय वातावरणात परीक्षा पार पाडण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक अनिल साबळे यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. गुरुवारपासून विभागातील ६२९ केंद्रांवर १.८० लाख विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्याच्या तयारीची लगबग शाळांसह, बोर्डात बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती.

बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नांदेड पॅटर्ननुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर सुरू होत असलेल्या लेखी परीक्षेत २,६१४ शाळांतील ९९ हजार ५४९ विद्यार्थी तसेच ८० हजार ६६१ विद्यार्थिनी असे एकूण १ लाख ८० हजार २१० परीक्षार्थी ६२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. गुरुवारपासून सुरू होणारी ही परीक्षा २५ मार्चपर्यंत असेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, झडती आणि गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शाळा, परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. दहावीतील गुणांच्या फुगवट्याने पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही पर्यवेक्षकांना करण्यात आल्या आहेत.

जि. प. अधिकाऱ्यांसह महसूलच्या पथकांची नजरकाॅपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षेसाठीची जय्यत तयारी विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना संपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या १० पथकांची नजर परीक्षेवर असणार आहे. परीक्षेच्या आधी एक तास व परीक्षेनंंतर एक तास सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास विभागीय सचिव विजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.

...तर पर्यवेक्षक अन् केंद्रप्रमुखांवरही कारवाईजिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची १० भरारी पथके, जिल्ह्यातील १७ संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके, शिक्षण विभागाची ६ भरारी पथके तसेच महिलांची २ स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत गैरप्रकार घडू नये, त्यासाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडणे, झडती घेऊनच परीक्षार्थ्यांना प्रवेश आणि केंद्रावर गैरप्रकार झाल्यास पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची जाणीव सर्व केंद्रप्रमुखांना करून दिली आहे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

विभागीय मंडळातील जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा - परीक्षा केंद्र - विद्यार्थी - विद्यार्थिनी - एकूण परीक्षार्थीछत्रपती संभाजीनगर - २२७ - ३५३२९ - २९२६४ - ६४५९३बीड - १५६ -२३७६४ - १७१५७ - ४१५२१जालना - ९३ - १५२०३ - १२५९७ - २७८००परभणी - १०० - १६९४३ - १३७४२ - ३०६७६हिंगोली - ५३ - ८३१९ - ७३०१ - १५६२०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावीEducationशिक्षण