शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:35 PM

पोलीस अधीक्षकांनी अचानक सदरील पथक बरखास्त केल्यामुळे पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा निर्णय   विशेष पथकाचे विवेक जाधव यांच्याकडे पीआरओ शाखेची जबाबदारी

औरंगाबाद : ग्रामीण भागात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नेमलेले विशेष पथक बरखास्त करण्यात आले आहे. पथकप्रमुख उपनिरीक्षक विवेक जाधव यांच्याकडे आता पीआरओ शाखा आणि सायबर शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतला असून, शनिवारी पथक बरखास्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दीड वर्षापूर्वी उपनिरीक्षक विवेक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही जोरदार कारवाई करीत असताना हे पथक नियुक्त करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. सदरचे विशेष पथक हे तात्पुरत्या स्वरूपाचे होते. त्यामुळे ते बरखास्त केल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शनिवारी एका आदेशान्वये कळविले आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी अचानक सदरील पथक बरखास्त केल्यामुळे पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या पथकात एलसीबीचे विवेक जाधव, व्हीआयपी सुरक्षा विभागातील पोलीस नाईक खामट, मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल त्रिंबक बनसोडे, अभिजित डहाळे, मोटार परिवहन विभागातील रोहिदास पगडे यांचा समावेश होता.

महिन्यापासून कारभार थंडग्रामीण पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष पथकाचा कारभार हा गेल्या महिनाभरापासून थंड होता. पथकप्रमुख विवेक जाधव यांना ज्या दिवशी सायबर आणि पीआरओ शाखेत बसविले त्याच दिवशी पथक बरखास्त होणार असल्याची बाब स्पष्ट झाली होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस