शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडीही विधानसभेपूर्वीच

By admin | Updated: September 26, 2014 01:28 IST

बाबूराव चव्हाण ,उस्मानाबाद जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया २१ सप्टेंबर रोजी पार पडली आहे. आता सभापतींच्या निवडींचा बारही विधानसभा निवडणुकीपूर्वीच उडणार आहे.

बाबूराव चव्हाण ,उस्मानाबादजि. प. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया २१ सप्टेंबर रोजी पार पडली आहे. आता सभापतींच्या निवडींचा बारही विधानसभा निवडणुकीपूर्वीच उडणार आहे. २ आॅक्टोंबर रोजी निवड प्रक्रिया घेण्यासंदर्भात प्रशासनाने तयारी सुरू केली असून सदस्यांना नोटिसा बजावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया विधानसभेपूर्वी होवू नये, म्हणून काँग्रेसच्या वतीने नानाविध प्रयत्न करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात विध्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला नसल्याची सबब पुढे करीत हायकोर्टामध्ये धाव घेवून निवड प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, त्यांना हायकोर्टाचाही दिलासा मिळाला नाही. त्यामुहे २१ सप्टेंबर रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली असता काँग्रेसने शिवसेना-भाजपासोबत घरोबा करून दोन्ही पदे आपल्याकडे ठेवली. अध्यक्षपदी काँग्रेसचेच धीरज पाटील तर उपाध्यक्षपदी सुधाकर गुंड यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे आता इच्छुकांचे सभापती पदाच्या निवडीकडे डोळे लागले आहेत. मागील अडीच वर्षातही काँग्रेसने सेना-भाजपाला सोबत घेवून सत्तेची समिकरणे साधली. त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कृषी सभापतीपद काँग्रेसने ठेवले होते. तर महिला व बालकल्याण, बांधकाम आणि समाजकल्याण सभापतीपद सेनेला दिले. त्यामुळे उर्वरित अडीच वर्षासाठी हाच फॉर्मुला कायम ठेवला जातो की त्यात बदल केला जातो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार मागील अडीच वर्षाप्रमाणेच उर्वरित अडीच वर्षासाठीही सभापती पदाचा फॉर्मुला कायम ठेवला जाणार आहे. असे झाल्यास शिवसेनेकडून कोणत्या तीन सदस्यांना या पदावर विराजमान होण्याची संधी दिली जाते, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसने सेना-भाजपाच्या पाठबळावर ही दोन्ही पदे आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. याला काही दिवस होत नाहीत तोच आता विधानसभा निवडणुकीला या पक्षांना सामोरे जावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सेना-भाजपासह काँग्रेस उमेदवार आमने-सामने लढणार आहेत. त्याच वेळी जिल्हा परिषदेत असलेली या तीन पक्षांची मैत्री प्रचाराच्या काळात तिन्ही पक्षांसाठी अडचणीची ठरणार आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वीच सभापतींच्या निवडी होणार असल्याने प्रचारकाळात या तिन्ही पक्षांना जनतेला उत्तर देताना जिल्हा परिषदेतील मैत्रीचा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी महिला तर समाजकल्याण सभापतीपदासाठी आरक्षित जागेवरून निवडून आलेला सदस्य द्यावा लागतो. मात्र, बांधकाम सभापतीपदावर कुठल्याही प्रवर्गातील व्यक्ती विराजमान होवू शकतो. त्यामुळे या ठिकाणी स्पर्धा असणार आहे. म्हणजेच इच्छुकांची संख्या अधिक असेल. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सध्या येरमाळा गटातील सेनेच्या लता पवार आणि शुष्मा देशमुख यांची नावे चेर्चेत आहेत. तर बांधकाम सभापतीपदासाठी दत्ता साळुंके आणि वालवड गटाचे दत्ता मोहिते यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. असे असले तरी या पैैकी कोणाच्या गळ्यात सभापतीची माळ पडते? हे निवडीच्या दिवशीच समोर येणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीवेळीही स्थानिक पक्षश्रेष्ठींनी कोणता उमेदवार विधान सभेच्या अनुषंगाने फायद्याचा ठरेल? हाच निकष डोळ्यासमोर ठेवून उमेदवार देण्यात आले. आणि त्यांना संबंधित खुर्च्यावरही बसविले. आता सभापतींची निवडही विधानसभेपूर्वीच होत असल्याने याही ठिकाणी विधानसभेच्या अनुषंगाने ‘प्लस-मायनस’चा विचार केला जाणार आहे.