शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

आत्मा कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले

By admin | Published: July 20, 2016 12:02 AM

औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत.

औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे सध्या हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या हेतूने राज्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावर या प्रकल्पाचे स्वतंत्र कार्यालय आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र चालू वर्षी निधी न मिळाल्यामुळे आत्माच्या जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जिल्ह्यात आत्मा अंतर्गत एकूण चार अधिकारी आणि २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ९ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, १२ विषय विशेषतज्ज्ञ आणि १ कॉम्प्युटर प्रोग्राम यांचा समावेश आहे. या सर्वांना एप्रिलपासून आतापर्यंत पगार मिळालेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक एस. एम. सोळुंके यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, निधीअभावी पगार रखडले होते. मात्र नुकताच ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या कर्मचाऱ्यांचे पगार होतील. केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर अधिकाऱ्यांचेही पगार रखडले होते, असेही त्यांनी नमूद केले.