शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात

By admin | Updated: July 17, 2014 00:25 IST

परभणी : राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्याच्या सुधारित भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिले़

परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्याच्या सुधारित भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार असल्याचे संकेत औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिले़ ही माहिती येथील काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी दिली़
कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून जातो़ आता या महामार्गाचा ६१ असा क्रमांक आहे़ या महामार्गाला परभणीजवळ बाह्य वळण रस्ता करण्यासाठी आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले़ परंतु, तरीही सव्वानऊ किमी लांबीचा हा रस्ता आजपर्यंत पूर्ण झालेला नाही़ निधी अभावी काम ठप्प असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या सुचनेवरून सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी या कामासंदर्भात पाठपुरावा सुरू केला़ या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते़ या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने औरंगाबाद येथे बैठक बोलावली होती़ या बैठकीत प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यु़जे़ चामरगोरे यांनी या प्रकल्पाचे काम पाहणाऱ्या व्होयाजॅन्ट्स कंपनीला रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक अलाइनमेंट करण्याचे आदेश दिले आहेत़
या संदर्भात चामरगोरे यांनी सांगितले, सार्वजनिक बांधकाम विभागाचा सव्वानऊ किमीचा रस्ता रद्दबातल असून, केंद्रीय नियमावलीस आधीन राहून नवीन प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला आहे़ हा प्रस्ताव मान्यतेच्या अंतीम टप्प्यात आहे़ या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता अग्रक्रमाने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ राष्ट्रीय महामार्ग ६१ (पूर्वीचा २२२) अंतर्गत मानवत रोड ते मालेगाव रोड या लांबीचे ३५० कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्र शासनाच्या मंजुरीच्या अंतीम टप्प्यात आहेत़ त्यानुसार ईपीसी मोडल अंतर्गत सुधारित परभणी बाह्य वळण रस्त्यासह सात मीटर रुंदीऐवजी १० मीटर रुंदी वाढविणे निश्चित आहे़ सुधारित बाह्य वळण रस्त्याची प्रस्तावित लांबी १४़६० किमी ग्राह्य धरता या महामार्गावर सद्यस्थितीत शासनाकडे उपलब्ध ६७ किमी लांबीसह एकूण लांबी ८१़६० किमी असताना केंद्र शासनाच्या ईपीसी मोडल अंतर्गत प्रकल्पाच्या ९० टक्के लांबीचे क्षेत्र शासनाच्या ताब्यात असणे प्रमुख अट आहे़ याच अटीवर बाह्य वळण रस्त्याच्या उर्वरित ८़१६ किमी (१० टक्के) लांबीसाठी भूसंपादन निधी वितरित करणे केंद्र शासनाला शक्य आहे़ या प्रस्तावित रस्त्याचा परभणी शहर हद्दीतील नगरविकास आराखड्यातील ६़४६ किमी लांबीसह उर्वरित ८़१६ किमी रस्त्याचे भूसंपादन राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड यांच्यासह सहकाऱ्याने करून दिल्यास केंद्र शासनाच्या सुधारित जमीन अधिग्रहण कायद्यानुसार निधी वितरित करता येईल, असेही चामरगोरे यांनी या बैठकीत स्पष्ट केले़ बैठकीस राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद परिमंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही़बी़ कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एम़ के़ भरसट, उपकार्यकारी अभियंता जी़ बी़ स्वामी, व्हायजेन्ट्स कंपनीचे सुपॉल घोष, काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
बेकायदेशीर बांधकामांना निर्बंध
बाह्य वळण रस्त्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली़ या बैठकीत बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनाचा नियोजन समितीचा आरक्षित निधी इतर विकास कामांवर खर्च झाल्याचा मुद्दा निघाला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी आवश्यकता असल्यास नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले़ तसेच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत यापुढे रस्त्याच्या मध्यापासून २८़५ मीटरऐवजी २१ मीटर अंतरावर बांधकाम नाहरकत परवानगी मिळणार आहे़ त्यामुळे याचा फायदा शहरातील ९५० बांधकामधारकांना झाला असून, महामार्गावरील बेकायदेशीर बांधकामांनाही पायबंद बसणार आहे़, अशी माहिती प्रवीण देशमुख यांनी दिली़
सुधारित भूसंपादन प्रक्रिया
राष्ट्रीय महामार्गाच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला़ या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने विशेष बैठक बोलावली आणि या बैठकीत सुधारित भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण देशमुख यांनी सांगितले़
१३९ अपघाती मृत्यू
१९९६ पासून आजपर्यंत बाह्य वळण रस्त्यासाठी मोजणीच्या कामावरच १ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे़ सव्वानऊ किमी अंतराचा हा बाह्य वळण रस्ता निधीअभावी रखडल्यामुळे मागील १७ वर्षांत १३९ अपघाती मृत्यू झाले आहेत़ बाह्य रस्ता झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल म्हणून प्रवीण देशमुख यांनी रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला़