शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

कधी दुष्काळ तर कधी कोरोनाचे सावट, वेरूळ-अजिंठा महोत्सवाला दशकापासून घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 14:10 IST

Ellora-Ajanta festival : मागील २१ वर्षांत केवळ सात वेळा झाला महोत्सव

- विकास राऊतऔरंगाबाद : वेरूळ-अजिंठा महोत्सवाला ( Ellora-Ajanta festival) दशकापासून घरघर लागली आहे. २०११ आणि २०१६ हे दोन वर्ष वगळले तर १३ वर्षांत १० वेळा हा महोत्सव रद्दच करावा लागला.

अजिंठा-वेरूळ महोत्सवाला आता कोरोनाची साथ पूर्णत: गेल्यावरच मुहूर्त लागेल असे चित्र दिसते आहे. वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी होणारा हा महोत्सव २००१ पासून विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात घेण्यास सुरुवात झाली. २००७ पर्यंत हा महोत्सव नियमितपणे झाला. त्यानंतर कोणत्या न कोणत्या कारणामुळे हा महोत्सव आयोजित होऊ शकला नाही. मराठवाड्याच्या राजधानीत होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाकडे आजवर कधीही गांभीर्याने न पाहिल्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचा ऱ्हास झाला आहे.

२००८ ते २०२१ या १३ वर्षांत फक्त दोनदा महोत्सव झाला. २०१७ साली महोत्सवाची पूर्ण तयारी झाली होती, परंतु ऐनवेळी महोत्सव रद्द करण्यात आला. औरंगाबादसह मराठवाडा दुष्काळाच्या छायेत होता. त्यामुळे सांस्कृतिक मेजवानीचे कार्यक्रम आयोजित करावे की न करावे, यावरून प्रशासन शासनाकडे गेले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करूच नये, असा अभिप्राय शासनाने दिल्यानंतर महाेत्सव रद्द करण्यात आला होता. २०१८ आणि २०१९ साली नियोजन झालेच नाही. तर २०२० मध्ये कोरोनाची लाट आल्यामुळे महोत्सवाचा प्रशासनाला विसरच पडला. २०२१ साली देखील तशीच अवस्था आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणतातजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, ओमायक्रॉनमुळे गर्दीच्या कार्यक्रमांवर शासनाकडूनच निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे अजिंठा महोत्सव आणि कृषी प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलले आहे. वेरूळ-अजिंठा महोत्सवाचा विचार कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर होऊ शकेल. परंतु सध्या कोणत्याही महोत्सवाचे आयोजन करणे शक्य नाही.

या कारणांनी हे वर्ष गेले महोत्सवाविना :२००८- मुंबई दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द२००९- स्वाईन फ्ल्यूची साथ आल्याने रद्द२०१०- शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे रद्द२०१३- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१४- दुष्काळामुळे महोत्सव रद्द२०१५- दुष्काळी स्थितीमुळे रद्द२०१७ - नियोजन होऊ शकले नाही२०१८- दुष्काळामुळे महोत्सव घेणे योग्य नाही२०१९-महोत्सव घेण्याचा निर्णयच झाला नाही२०२०- कोरोनामुळे महोत्सव रद्द२०२१- कोरोना, ओमायक्रॉनमुळे महोत्सवावर गदा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjantha - Elloraअजंठा वेरूळState Governmentराज्य सरकार