शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल टायमर गायब

By admin | Updated: November 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत

औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या जबाबदाऱ्यांतून मनपा प्रशासन हात झटकत आहे. शहरातील अनेक चौकांमधील सिग्नलवर बसविण्यात आलेले टायमर घड्याळच गायब झाले आहेत. कोणत्या सिग्नलवर किती थांबावे लागेल, हे वाहनधारकांना कळायला मार्गच नाही.महापालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सव्वाकोटी रुपये खर्च करून २७ सिग्नल अत्याधुनिक केले होते. पूर्वी सिग्नल लांब अंतरावरून दिसत नव्हते. त्यासाठी मनपाने उंच पोल उभारून सिग्नल लावले. प्रत्येक चौकात टायमर घड्याळ बसविण्यात आले होते. ही चांगली सुविधा औरंगाबादकरांना काही वर्षेच अनुभवता आली. मागील काही वर्षांपासून अनेक सिग्नलवरील टायमर गायब झाले आहेत. अत्यंत मोजक्याच चौकात हे टायमर घड्याळ दिसतात; पण त्यात किती वेळ थांबायचे ते आकडेच दिसत नाहीत. ११ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून मनपाने शहरातील सर्व वाहतूक दिवे चांगले केले होते. पूर्वी शहरातील सिग्नलची जी अवस्था होती, तीच अवस्था सध्या होऊन बसली आहे. अनेक ठिकाणी तर आता सिग्नलच दिसत नाहीत. रात्री ९ वाजेनंतर फक्त पिवळा दिवा सुरू असायला हवा, अनेक ठिकाणी लाल दिवा बंद-चालू असतो. त्यामुळे नवीन वाहनधारक बुचकळ्यात पडतात. अचानक ब्रेक मारल्याने जालना रोडवर रात्री अपघातही झाले आहेत. मोंढा नाका, आकाशवाणी आणि अमरप्रीत चौकात रात्री १० ते १२ वाजेपर्यंत अनेक वाहनधारक वेगात जाण्याच्या प्रयत्नात सिग्नलवरील विचित्र दिवा पाहून अचानक थांबतात. विशेष बाब म्हणजे रात्री ९ वाजेनंतर शहरात जड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.