शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पारंपारिक शेतीला फाटा, रोपवाटिका उभारून भावंड कमवतात महिन्याला लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 19:54 IST

परंपरागत शेती करणे परवडत नसल्याने एक वेगळा प्रयोग म्हणून दोघांनी ९ वर्षा पूर्वी रोपवाटिका सुरु केली.

फुलंब्री : तालुक्यातील गेवराई पायगा येथील दोन शेतकरी भावंडानी नवीन प्रयोग करून तीन एकर क्षेत्रात रोपवाटिका उभारली. एका वर्षात एक कोटी रोपे त्यांनी विकली. यातून ते महिन्याकाठी दोन लाख रुपये कमावत आहेत. सोबतच ३० जणांना रोजगार ही या भावडांनी उपलब्ध करून दिला आहे.

गेवराई पायगा येथील शेतकरी गजानन साबळे व श्रीराम साबळे ह्या  दोन भावंडाकडे एकूण आठ एकर शेती आहे. त्यांनी पाच एकर जमिनीवरील दहा गुंठे क्षेत्रात २०१४ मध्ये मिरची, टमाटे, वांगे, कोबी, टरबूज, खरबूज पपई, शेवगा, झेंडू फुले, कारले, दोडके याची रोपवाटिका सुरु केली. २०१९ मध्ये कृषी विभागाकडून शेडनेट मिळाले. यामुळे रोपवाटिकेचा विस्तार झाला. आता प्रत्येक वर्षी एक कोटी रोपे तयार करून ते विक्री करीत आहेत.  यातून महिन्याकाठी दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे शेतकरी भावडांनी सांगितले.

३० जणांना रोजगार दिलाया रोपवाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीचे रोप टॅग केले जाते़. रोपे तयार केल्यानंतर वहित जात, तारीख, खते, पाणी यांची नोंद केली जाते़. कोणते रोप किती प्रमाणावर उगवले याची नोंद ते ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांची  फसवणूक होत नाही़. शेतक-यांनी कोणते पीक घेतले म्हणजे फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करून ते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन ही करतात. याशिवाय रोपवाटिकामध्ये भाजीपालासह, फळ, फुलांची रोपे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यातून त्यांच्या कुटुबियांबरोबर आणखी ३० जणांना रोजगार मिळाला आहे. 

हायटेक पद्धतीने रोपनिर्मिती सुमारे तीन एकरांवर सध्या त्यांच्याकडे रोपवाटिका आहे  त्यांच्याकडे रोपांची निर्मिती पूर्णपणे ट्रेमध्ये केली जाते.ट्रे भरण्यासाठी कोकोपीट चा वापर केला जातो ,ट्रेमध्ये बी भरण्यासाठी खास सीडलिंग मशिन आहे.या मशिनद्वारे बियाणे  ट्रेम मध्ये भरली जाते मशीन मुळे बियाणे सारख्या खोल अनंतराव टोकन होते त्यामुळे सर्व रोपे ही एकसमान तयार होतात. ट्रे खाली विशिष्ठ अशी मॅट असल्याने रोपांचे बुरशीजन्य रोगांसह अन्य कीड- रोगांपासूनही संरक्षण होते. या रोपवाटिका मधून मिळणारे विविध भाजीपाल्याचे रोपे जालना, औरंगाबाद  या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी शेतात येऊन खरेदी करीत आहेत दररोज शेड नेट ठिकाणी शेतकऱ्यांना आपली वाहाने घेऊन येतात नामांकित बियाणे कंपनीचे रोपे असल्याने यात फारसे नुकसान होत नाही 

महिन्याकाठी दोन लाख मिळतात रोपवाटिका मध्ये भाजीपाला पिकाची रोपे असल्याने हि रोपे बागायती शेतकऱ्यांना आवश्यक असतात म्हणून वर्षाला किमान एक कोटी रोपे येथून विकली जातात एक रोपाची किमत एक रुपया २५ पैसे प्रमाणे असते. एका वर्षाला एक कोटी रोपे विकली जातात यातून मिळणारी सव्वा कोटी रुपयातून ८० टक्के रक्कम बियाणे, ट्रें खरेदी, खते, औषधी, नारळपीठ, मजुरी यांना जाते उर्वरित २० टक्के रक्कम निव्वळ नफा राहतो. एक वर्षाला २५ लाख रुपये मिळतात.

वेगळा प्रयोग म्हणून केली सुरुवात परंपरागत शेती करणे परवडत नसल्याने एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही दोघांनी ९ वर्षा पूर्वी रोपवाटिका सुरु केली. सुरुवातीला जेमतेम विक्री होत होती. शेडनेट नव्हते. २०१९ नंतर रोपवाटिकाचा विस्तार झाला. मागील दोन वर्षांपासून प्रत्येक वर्षी एक कोटी पर्यंत रोपे विकली जातात. यापासून आर्थिक फायदा होत आहे अशी माहिती शेतकरी बंधू गजानन आणि श्रीराम साबळे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद