शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

राज्यभरातील आंदोलक शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घ्यावीत; खंडपीठात जनहित याचिकेद्वारे विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:57 PM

राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्याची याचिकाकर्त्याची मुख्य विनंती

ठळक मुद्देपुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर 

औरंगाबाद : हमी भाव, अनुदान, कर्जमाफी आदींसाठी आंदोलने करणाऱ्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांविरुद्धचे फौजदारी खटले शासन निर्णयानुसार मागे घेण्याची विनंती करणारी ‘जनहित’ याचिका शेतकरी युवा संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित बबनराव काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

आंदोलनात जीवित हानी झाली नसलेल्या, तसेच सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची पाच लाखांपेक्षा कमी वित्तहानी झालेल्या घटनांमधील २०१४ पूर्वीचे फौजदारी खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ देत राज्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले शेतकऱ्यांविरुद्धचे खटले मागे घेण्याची याचिकाकर्त्याची मुख्य विनंती आहे. काळे यांनी याचिकेत नमूद केल्यानुसार मान्सूनचा लहरीपणा, वातावरणातील बदल आणि शेतीचे कमी उत्पादन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची सामाजिक व आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला (पिकांना) योग्य हमी भाव दिला नाही. परिणामी, शेतकरी अनुदानासाठी शासनावर अवलंबून आहेत. शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांना आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रस्त्यावर उतरावे लागते. परिणामी, मागील काही वर्षांत हमी भाव, अनुदान, कर्जमाफी आदींसाठी शेतकऱ्यांनी राज्यभरात आंदोलने केली. परिणामी, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आणि काही घटनांमध्ये मालमत्तांचे नुकसान केल्याबद्दल शेतकऱ्यांविरुद्ध राज्यातील विविध न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, समाजात शांतता व सौहार्दता नांदावी यासाठी आंदोलनादरम्यान जीवित हानी झाली नसलेल्या, तसेच सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची पाच लाखांपेक्षा कमी वित्तहानी झालेल्या घटनांमधील सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्धचे फौजदारी खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ७ जुलै २०१० रोजी घेतला होता. त्यानंतर शासनाने १३ जानेवारी २०१५ रोजी वरील शासन निर्णयात ‘२०१४ पूर्वीचे’ वरील प्रकारात मोडणारे फौजदारी खटले मागे घेण्याची दुरुस्ती केली. त्यानंतर ज्या घटनांमध्ये जीवित आणि वित्तहानी झाली नाही, असे खटले त्वरित मागे घेण्याची शिफारस यासाठी नेमलेल्या समितीने सरकारी वकिलांना करावी, तसेच सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे पाच लाखांपर्यंत नुकसान झालेल्या घटनांमधील आरोपींच्या अर्जांची वाट न पाहता समितीने स्वत: खात्री करण्याचा निर्णय शासनाने १४ मार्च २०१६ रोजी घेतला होता. याचा लाभ देऊन शेतकऱ्यांवरील खटले मागे घ्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ