शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

पुंजाराम शेरे ,शेवगा सुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.

पुंजाराम शेरे ,शेवगासुरुवातीपासूनच पडत असलेल्या जेमतेम पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. परिणामी, अंबड तालुक्यावर दुष्काळाची छाया गडद होत आहे.जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल आहे. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळातून शेतकरी अद्यापही सावरलेला नाही. आता पुन्हा दुष्काळाचे संकट डोक्यावर आहे. पावसाअभावी शेतकरी, शेतमजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. परिसरात पाऊस नसल्याने मजुरांना काम मिळत नाही. अनेक तरुण रानावनात भटकंती करुन लिंबोळी वेचून त्यावर प्रपंच चालवित आहेत. येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर प्रश्न बिकट होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानीने शेतकरी हतबल असताना खरिपातही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस ही नगदी पिके हातची गेली. रबी हंगामाचा डोलारा असलेला खरीप हंगाम हातचा गेल्याने रबीची सोय करणे जिकिरीचे झाले आहे. रबीसोबतच दैनंदिन व्यवहार चालविण्याचा प्रश्न बिकट बनत आहे. या सर्व बाबींचे निरीक्षण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला अहवाल सादर करुन अंबड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर शेळके, शंकर शेळके, मधुकर वाघ, कुंडलिक राघवन, दत्ता राऊत, मनोहर खरात, ज्ञानेश्वर तिकांडे, श्याम तिकांडे, बंडू खोरे, रामनाथ खरात, कारभारी शेळके, नवनाथ शेरे, शिवाजी वाघ, सचिन अटकर आदींनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करातालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढावेत अशी मागणी होत आहे. पावसाअभावी पीकपाणी हातचे गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्नच बिकट झालेला आहे. भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळा, महाविद्यालयांचे तोंड कसे बंद करावे, असा यक्षप्रश्न निर्माण झालेला आहे.ग्रामीण भागात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय नसल्याने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शहरी भागात शिक्षणासाठी जावे लागते. वह्या-दप्तरासोबतच शाळेचे शुल्क आणि इतर खर्चाची जुळावा जुळव करताना जनतेच्या नाकीनऊ येत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारातील आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.