शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जगाला एकसंध ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:14 IST

सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे.

औरंगाबाद : सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे. धर्म ही वैयक्तिक बाब समजून सबंध मानवजातीला मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारी व्यवस्था आवश्यक आहे, असे प्रतिपादन जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.एकदा लडाखमध्ये असताना तेथील एका स्थानिक इमामांनी सांगितलेले विचार मौलिक वाटतात. ते म्हणाले होते ‘मी प्रथम अल्लावर प्रेम करतो, नंतर अल्लाने निर्माण केलेल्या सृष्टीवर प्रेम करतो’ हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे. बुद्धाचीही अशीच शिकवण आहे. भारताची लोकशाही ही याच विचारावर आधारित आहे. मानवजातीला मन:शांतीची गरज आहे, असे बुद्ध सांगत असत. आज वैज्ञानिकही तेच सांगत आहेत. समाजातील वैयक्तिक व्यवहार हे मानवतावादी असल्यास चांगल्या  समाजाची निर्मिती होऊ शकते. असे सांगून जगभरातील बौद्ध धर्मीयांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार काय आहे, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्कृत भाषेतील आधारित बौद्ध तत्त्वज्ञानाचा वापर मंगोलिया, तिबेट, चीन, व्हिएतनाम, कोरिया आणि म्यानमार या देशांत केला जातो, तर मूळ पाली भाषेतील तत्त्वज्ञानावर आधारित बौद्ध धर्माचे झाले. थायलंड, श्रीलंका, बर्मा, कंबोडिया आदी देशात केले जाते. बुद्धाचे विचार आणि तत्त्वज्ञान हे मूळ पाली भाषेतच आहे, असेही दलाई लामा म्हणाले.धर्म ही व्यक्तिकेंद्रित व्यवस्था नाही. बुद्धालाही ते मान्य नव्हते. बुद्धाने स्वत:हून अनुयायांना सांगितले होते ते म्हणजे ‘माझे विचार सारासार विचार करून पटले तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या’. शिक्षण आणि अभ्यासातून बुद्ध धम्माचे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून ते लोकांना सांगणे हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्ध धम्मात आत्म्याला स्थान नाही, पण ज्ञानाला स्थान आहे. त्यामुळे बुद्ध कधीही आत्मा आणि अनात्मा या विवादात पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.बुद्धाला विष्णूचा ९ वा अवतार मानले जाते, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होय हे शक्य आहे, कारण भारत हा अध्यात्म मांडणारा आणि अतिप्राचीन अशी संस्कृती असणारा देश असल्याने इथे अनेक विचारधारा स्वीकारल्या गेल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील बौद्ध धर्मातील पुनर्स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. १९५६ ला त्यांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देऊन बौद्ध धम्मात आणले. समतेचा पुरस्कार करणारे आणि जातीवर आधारित भेदभावपूर्ण व्यवस्था नाकारणारे ते महान नेते होते. त्यांनी जातीवर आधारित वरील वर्गाच्या लोकांनी खालच्या जातीवर राज्य गाजविणारी व्यवस्था कालबाह्य असल्याचे सांगितले. मला भारतीय लोकशाहीचे कौतुक वाटते. येथे स्वातंत्र्य आहे. जगात पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये ते स्वातंत्र्य नाही, असेही दलाई लामा म्हणाले. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबादInternationalआंतरराष्ट्रीय