शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जगाला एकसंध ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:14 IST

सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे.

औरंगाबाद : सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे. धर्म ही वैयक्तिक बाब समजून सबंध मानवजातीला मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारी व्यवस्था आवश्यक आहे, असे प्रतिपादन जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.एकदा लडाखमध्ये असताना तेथील एका स्थानिक इमामांनी सांगितलेले विचार मौलिक वाटतात. ते म्हणाले होते ‘मी प्रथम अल्लावर प्रेम करतो, नंतर अल्लाने निर्माण केलेल्या सृष्टीवर प्रेम करतो’ हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे. बुद्धाचीही अशीच शिकवण आहे. भारताची लोकशाही ही याच विचारावर आधारित आहे. मानवजातीला मन:शांतीची गरज आहे, असे बुद्ध सांगत असत. आज वैज्ञानिकही तेच सांगत आहेत. समाजातील वैयक्तिक व्यवहार हे मानवतावादी असल्यास चांगल्या  समाजाची निर्मिती होऊ शकते. असे सांगून जगभरातील बौद्ध धर्मीयांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार काय आहे, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्कृत भाषेतील आधारित बौद्ध तत्त्वज्ञानाचा वापर मंगोलिया, तिबेट, चीन, व्हिएतनाम, कोरिया आणि म्यानमार या देशांत केला जातो, तर मूळ पाली भाषेतील तत्त्वज्ञानावर आधारित बौद्ध धर्माचे झाले. थायलंड, श्रीलंका, बर्मा, कंबोडिया आदी देशात केले जाते. बुद्धाचे विचार आणि तत्त्वज्ञान हे मूळ पाली भाषेतच आहे, असेही दलाई लामा म्हणाले.धर्म ही व्यक्तिकेंद्रित व्यवस्था नाही. बुद्धालाही ते मान्य नव्हते. बुद्धाने स्वत:हून अनुयायांना सांगितले होते ते म्हणजे ‘माझे विचार सारासार विचार करून पटले तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या’. शिक्षण आणि अभ्यासातून बुद्ध धम्माचे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून ते लोकांना सांगणे हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्ध धम्मात आत्म्याला स्थान नाही, पण ज्ञानाला स्थान आहे. त्यामुळे बुद्ध कधीही आत्मा आणि अनात्मा या विवादात पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.बुद्धाला विष्णूचा ९ वा अवतार मानले जाते, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होय हे शक्य आहे, कारण भारत हा अध्यात्म मांडणारा आणि अतिप्राचीन अशी संस्कृती असणारा देश असल्याने इथे अनेक विचारधारा स्वीकारल्या गेल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील बौद्ध धर्मातील पुनर्स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. १९५६ ला त्यांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देऊन बौद्ध धम्मात आणले. समतेचा पुरस्कार करणारे आणि जातीवर आधारित भेदभावपूर्ण व्यवस्था नाकारणारे ते महान नेते होते. त्यांनी जातीवर आधारित वरील वर्गाच्या लोकांनी खालच्या जातीवर राज्य गाजविणारी व्यवस्था कालबाह्य असल्याचे सांगितले. मला भारतीय लोकशाहीचे कौतुक वाटते. येथे स्वातंत्र्य आहे. जगात पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये ते स्वातंत्र्य नाही, असेही दलाई लामा म्हणाले. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबादInternationalआंतरराष्ट्रीय