शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागाला सर्वाधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागात कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, ...

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागात कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत आतापर्यंत तब्बल ५६० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, दिवसेंदिवस मृत्यूचे तांडव सुरूच आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील २६३ गावांनी विविध उपाययोजना करीत कोरोनाला वेशीवरच रोखले हे विशेष.

एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली. कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूचा सामना करताना आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आणि तो सामना आजही करावा लागत आहे. त्यात पूर्वीसारखी भीती मात्र कमी झाली होती. तोच २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यात शहराबरोबरच ग्रामीण जिल्ह्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढला आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कन्नड, पैठण, वैजापूर, औरंगाबाद तालुक्यांनी तीन हजारांचा कोरोनाबाधितांचा पल्ला गाठला आहे. तर खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड या तालुक्यांतदेखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, तर दुसरीकडे कोरोना लसीकरणावरदेखील जोर दिला जात आहे.

ऑक्सिजनसाठी नव्वद किलोमीटरचा प्रवास

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेकडे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आली. अनेक तालुक्यांची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णवाहिका मिळत नाही, तर अत्यावश्यक औषधे मिळत नसल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. सोयगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे जवळपास पन्नास ते साठ रुग्णांना औरंगाबाद शहरात तर जळगाव जिल्ह्यात रेफर करण्याची वेळ आली.

प्राणवायू न मिळाल्याने मृत्युसत्र सुरू

प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी एक-दोन व्हेंटिलेटर आहेत त्यातही दुरुस्तीची बोंबाबोब असते. अशा ठिकाणी रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला रेफर केले जाते. शहरात तो रुग्ण येईपर्यंत वाटेतच त्याचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे मृत्युसत्र सुरूच आहे.

तालुका एकूण रुग्ण बा. गावे. को. रो. गावे मृत्यू

फुलंब्री : १३१८ : ८४ : १८ : ४९

सोयगाव : ४०२ : ७० : १६ : २२

कन्नड : ३९९९ : १७२ : ४४ : १२५

पैठण : ३७१८ : १०६ : २९ : ५५

वैजापूर : ३६१२ : १६१ : ०७ : ७१

औरंगाबाद : ३८७२ : १०८ : २८ : ३५

खुलताबाद : ८५० : ६२ : १७ : ३७

गंगापूर : ५०६५ : १३६ : ५८ : ९०

सिल्लोड : १२२० : ८६ : ४६ : ७६

जिल्हामध्ये मृत्यूचे तांडव :

फुलंब्री : ४९

सोयगाव : २२

कन्नड : १२५

पैठण : ५५

वैजापूर : ७१

औरंगाबाद : ३५

खुलताबाद : ३७

गंगापूर : ९०

सिल्लोड : ७६