शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागाला सर्वाधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागात कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, ...

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून जिल्हाभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागात कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सुरू होताच ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत आतापर्यंत तब्बल ५६० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, दिवसेंदिवस मृत्यूचे तांडव सुरूच आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील २६३ गावांनी विविध उपाययोजना करीत कोरोनाला वेशीवरच रोखले हे विशेष.

एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कामाला लागली. कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूचा सामना करताना आरोग्य यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आणि तो सामना आजही करावा लागत आहे. त्यात पूर्वीसारखी भीती मात्र कमी झाली होती. तोच २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. यात शहराबरोबरच ग्रामीण जिल्ह्यातदेखील कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढला आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कन्नड, पैठण, वैजापूर, औरंगाबाद तालुक्यांनी तीन हजारांचा कोरोनाबाधितांचा पल्ला गाठला आहे. तर खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड या तालुक्यांतदेखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढीस लागली आहे. आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, तर दुसरीकडे कोरोना लसीकरणावरदेखील जोर दिला जात आहे.

ऑक्सिजनसाठी नव्वद किलोमीटरचा प्रवास

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेकडे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आली. अनेक तालुक्यांची आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णवाहिका मिळत नाही, तर अत्यावश्यक औषधे मिळत नसल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. सोयगाव तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे जवळपास पन्नास ते साठ रुग्णांना औरंगाबाद शहरात तर जळगाव जिल्ह्यात रेफर करण्याची वेळ आली.

प्राणवायू न मिळाल्याने मृत्युसत्र सुरू

प्रत्येक तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी एक-दोन व्हेंटिलेटर आहेत त्यातही दुरुस्तीची बोंबाबोब असते. अशा ठिकाणी रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्याला रेफर केले जाते. शहरात तो रुग्ण येईपर्यंत वाटेतच त्याचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे मृत्युसत्र सुरूच आहे.

तालुका एकूण रुग्ण बा. गावे. को. रो. गावे मृत्यू

फुलंब्री : १३१८ : ८४ : १८ : ४९

सोयगाव : ४०२ : ७० : १६ : २२

कन्नड : ३९९९ : १७२ : ४४ : १२५

पैठण : ३७१८ : १०६ : २९ : ५५

वैजापूर : ३६१२ : १६१ : ०७ : ७१

औरंगाबाद : ३८७२ : १०८ : २८ : ३५

खुलताबाद : ८५० : ६२ : १७ : ३७

गंगापूर : ५०६५ : १३६ : ५८ : ९०

सिल्लोड : १२२० : ८६ : ४६ : ७६

जिल्हामध्ये मृत्यूचे तांडव :

फुलंब्री : ४९

सोयगाव : २२

कन्नड : १२५

पैठण : ५५

वैजापूर : ७१

औरंगाबाद : ३५

खुलताबाद : ३७

गंगापूर : ९०

सिल्लोड : ७६