शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोसमी वाऱ्याची मराठवाड्याच्या दिशेने वाटचाल

By admin | Updated: June 24, 2014 01:08 IST

औरंगाबाद : नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा सोमवारी सकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे होती. मात्र, दुपारनंतर ही दिशा बदलून उत्तर- पश्चिम झाली आहे.

औरंगाबाद : नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा सोमवारी सकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे होती. मात्र, दुपारनंतर ही दिशा बदलून उत्तर- पश्चिम झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी आशादायी चित्र आहे. तरीही मराठवाड्यात पाऊस दाखल होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात यंदा पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर हवामानाच्या अभ्यासकांकडून जाणून घेतले असता त्यांनी मराठवाड्यात पाऊस येण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले.हवामानाचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रानुसार सोमवारी सकाळपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा उत्तर- पूर्व होती. म्हणजे हे वारे ओरिसा, छत्तीसगडच्या दिशेने वाहत होते. मात्र, दुपारनंतर त्यात बदल झाला आहे. ही दिशा आता उत्तर- पश्चिम झाली आहे. हीच दिशा पुढेही कायम राहिली तर येत्या दोन ते तीन दिवसांत ढग मराठवाड्यात पोहोचतील; पण त्यामुळे समाधानकारक पाऊस पडेलच असे मात्र निश्चित सांगता येणारनाही. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान विभागातील प्रा. प्रल्हाद जायभाये म्हणाले की, मान्सूनची व्याख्या पाहता तो याआधीच मराठवाड्यात दाखल झालेला आहे, असे म्हणावे लागेल. काही ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडलाही आहे. मात्र, त्याचा जोर कमी होता. आता बंगालच्या उपसागराकडून नैऋत्य मोसमी वारे वेगाने उत्तर- पश्चिमेच्या दिशेने येत आहेत. ही दिशा कायम राहिल्यास पुढील दोन- तीन दिवसांत मराठवाड्यात अनुकूल परिस्थिती तयार होऊन पाऊस पडेल. अन्नधान्याची राज्यांतर्गत आयात-निर्यात करणारे औरंगाबादेतील व्यापारी प्रकाश जैन यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वीच मूग आणि उडदाचा भाव खाली आला आहे. सध्या मूग आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल जात आहे. तर उडदाचा भाव सात हजार ते सात हजार दोनशे रुपये आहे.डाळींचा भाव प्रतिकिलो ९० रुपयांपर्यंत आहे. मात्र, यंदाच्या हंगामात फारसे उत्पादन होणार नसल्यामुळे दर पुन्हा वाढतील. त्यात नेमकी किती वाढ होईल हे निश्चित सांगता येणार नसले तरी ती वाढ येत्या महिनाभरातच झालेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले. उशिरा पावसाचा फटकाऔरंगाबाद : पावसाअभावी मराठवाड्यात मूग आणि उडदाच्या पेरणीचा हंगाम निघून जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. परिणामी, राज्यातील मूग आणि उडदाच्या उत्पादनात जबरदस्त घट होऊन त्यांचा भाव वाढण्याची शक्यता आहे. मूग आणि उडदाचे भाव नुकतेच घसरले होते. ते महिनाभरात पुन्हा वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मराठवाड्यात दरवर्षी खरीप हंगामात सुमारे दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावर मूग आणि उडीद या कडधान्य पिकांची पेरणी होते. जून महिना हा या पिकांच्या पेरणीचा हंगाम आहे.हंगाम निघून गेल्यावर पेरणी झाल्यास ती पिके व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे शेतकरीही जूननंतर या पिकांची पेरणी करीत नाहीत. यंदा जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे यंदा मराठवाड्यात या कडधान्य पिकांच्या पेरणीचा हंगाम पावसाअभावी निघून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.राज्यातील मूग आणि उडदाचे उत्पादन यंदा घटणार आहे. परिणामी जूननंतर या दोन्हींचे दर वाढणार आहेत.