शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मोसमी वाऱ्याची मराठवाड्याच्या दिशेने वाटचाल

By admin | Updated: June 24, 2014 01:08 IST

औरंगाबाद : नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा सोमवारी सकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे होती. मात्र, दुपारनंतर ही दिशा बदलून उत्तर- पश्चिम झाली आहे.

औरंगाबाद : नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा सोमवारी सकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे होती. मात्र, दुपारनंतर ही दिशा बदलून उत्तर- पश्चिम झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी आशादायी चित्र आहे. तरीही मराठवाड्यात पाऊस दाखल होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात यंदा पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर हवामानाच्या अभ्यासकांकडून जाणून घेतले असता त्यांनी मराठवाड्यात पाऊस येण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले.हवामानाचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रानुसार सोमवारी सकाळपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा उत्तर- पूर्व होती. म्हणजे हे वारे ओरिसा, छत्तीसगडच्या दिशेने वाहत होते. मात्र, दुपारनंतर त्यात बदल झाला आहे. ही दिशा आता उत्तर- पश्चिम झाली आहे. हीच दिशा पुढेही कायम राहिली तर येत्या दोन ते तीन दिवसांत ढग मराठवाड्यात पोहोचतील; पण त्यामुळे समाधानकारक पाऊस पडेलच असे मात्र निश्चित सांगता येणारनाही. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान विभागातील प्रा. प्रल्हाद जायभाये म्हणाले की, मान्सूनची व्याख्या पाहता तो याआधीच मराठवाड्यात दाखल झालेला आहे, असे म्हणावे लागेल. काही ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडलाही आहे. मात्र, त्याचा जोर कमी होता. आता बंगालच्या उपसागराकडून नैऋत्य मोसमी वारे वेगाने उत्तर- पश्चिमेच्या दिशेने येत आहेत. ही दिशा कायम राहिल्यास पुढील दोन- तीन दिवसांत मराठवाड्यात अनुकूल परिस्थिती तयार होऊन पाऊस पडेल. अन्नधान्याची राज्यांतर्गत आयात-निर्यात करणारे औरंगाबादेतील व्यापारी प्रकाश जैन यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वीच मूग आणि उडदाचा भाव खाली आला आहे. सध्या मूग आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल जात आहे. तर उडदाचा भाव सात हजार ते सात हजार दोनशे रुपये आहे.डाळींचा भाव प्रतिकिलो ९० रुपयांपर्यंत आहे. मात्र, यंदाच्या हंगामात फारसे उत्पादन होणार नसल्यामुळे दर पुन्हा वाढतील. त्यात नेमकी किती वाढ होईल हे निश्चित सांगता येणार नसले तरी ती वाढ येत्या महिनाभरातच झालेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले. उशिरा पावसाचा फटकाऔरंगाबाद : पावसाअभावी मराठवाड्यात मूग आणि उडदाच्या पेरणीचा हंगाम निघून जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. परिणामी, राज्यातील मूग आणि उडदाच्या उत्पादनात जबरदस्त घट होऊन त्यांचा भाव वाढण्याची शक्यता आहे. मूग आणि उडदाचे भाव नुकतेच घसरले होते. ते महिनाभरात पुन्हा वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.मराठवाड्यात दरवर्षी खरीप हंगामात सुमारे दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावर मूग आणि उडीद या कडधान्य पिकांची पेरणी होते. जून महिना हा या पिकांच्या पेरणीचा हंगाम आहे.हंगाम निघून गेल्यावर पेरणी झाल्यास ती पिके व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे शेतकरीही जूननंतर या पिकांची पेरणी करीत नाहीत. यंदा जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे यंदा मराठवाड्यात या कडधान्य पिकांच्या पेरणीचा हंगाम पावसाअभावी निघून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.राज्यातील मूग आणि उडदाचे उत्पादन यंदा घटणार आहे. परिणामी जूननंतर या दोन्हींचे दर वाढणार आहेत.