शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

१० पटांच्या खालील शाळांना लागणार टाळे; औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ शाळा शासनाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 7:59 PM

शासनाच्या या धोरणामुळे गाव तिथे शाळा आणि सर्वांना शिक्षण ही योजना कालबाह्य ठरणार आहे.

ठळक मुद्देगेल्या दशकापासून राज्य सरकारने २० पटांखालील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे. अलीकडे काही महिन्यांपासून १० पटांखालील शाळांची माहिती राज्य स्तरावर संकलित करण्याचे काम

औरंगाबाद : राज्यात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या तब्बल ४ हजार ६९० शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यात शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात आघाडी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ६२ शाळा रडारवर आहेत. 

तत्कालीन राज्य सरकारचे तुघलकी धोरण विद्यमान महाविकास आघाडी सरकारने हाती घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाच्या या धोरणामुळे गाव तिथे शाळा आणि सर्वांना शिक्षण ही योजना कालबाह्य ठरणार आहे. गेल्या दशकापासून राज्य सरकारने २० पटांखालील शाळा बंद करण्याचे धोरण सुरू केले आहे.  तेव्हा या धोरणाविरोधात  राज्यभर रोष उमटला. शिक्षक संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचा हा डाव हाणून पाडला. त्यातच निवडणुका आल्या आणि शासनाला आपला निर्णय गुंडाळावा लागला होता.

अलीकडे काही महिन्यांपासून १० पटांखालील शाळांची माहिती राज्य स्तरावर संकलित करण्याचे काम वेगाने सुरू असून, जवळजवळ पूर्ण झाले आहे. शासनाच्या नव्या धोरणाने १० पटांखालच्या सप्टेंबर २०१७ च्या पटसंख्येनुसार राज्यातील तब्बल ४,६९० शाळांची यादी तयार करण्यात आली आहे. या शाळा आता बंद करण्याबाबत नुकतीच शिक्षण सचिवांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन अशा शाळांचा जिल्हानिहाय आढावा घेतला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६२  शाळा बंदच्या उंबरठ्यावर आहेत. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील- ५, फुलंब्री- ७, सिल्लोड- २३, सोयगाव- १, कन्नड- १६, गंगापूर- ३, वैजापूर- ५ आणि पैठण तालुक्यातील २ शाळांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक वस्तीशाळा आहेत. विशेष म्हणजे, सद्य:स्थितीत ज्या शाळेची पटसंख्या १० पेक्षा जास्त आहे. अशा काही शाळांचाही यादीत समावेश आहे. 

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा घेणारयासंदर्भात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस.पी. जायस्वाल यांनी सांगितले की, दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर शिक्षक तैनात करणे परवडणारे नाही. अशा शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पाठवले जाणार असून, जाण्या-येण्याची असुविधा असेल, तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना नेण्या- आणण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे भाडे शासन देणार आहे. ही यादी जुनी असून, लॉकडाऊन उघडल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत अशा शाळांचा आढावा घेतला जाणार आहे.

या धोरणामुळे वाड्या- वस्त्यांवरील मुले शिक्षणापासून वंचित राहून शिक्षण हक्क अधिनियम २००९ चे उल्लंघन होणार आहे. या मुलांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार शासन हिरावून घेऊ शकत नाही. वस्ती तिथे शाळा असलीच पाहिजे. यासाठी आता जागरूक राहून शिक्षण वाचवा आंदोलनाची बांधणी पालकांकडूनच होणे गरजेचे आहे, असे शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस  विजय कोंबे, विजय साळकर, रंजित राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबाद