शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: February 3, 2015 01:01 IST

औरंगाबाद : शौचालय संकुल बांधण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाने २०१२ मध्ये अनेक शाळांना प्रत्येकी १ लाख रुपये निधी दिला होता.

औरंगाबाद : शौचालय संकुल बांधण्यासाठी सर्व शिक्षा अभियानाने २०१२ मध्ये अनेक शाळांना प्रत्येकी १ लाख रुपये निधी दिला होता. परंतु त्यातील अनेक शाळांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. काहींनी केले ते निकृष्ट दर्जाचे केले. त्यामुळे ज्या शाळांना निधी देण्यात आला, त्या शाळांनी केलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी सोमवारी (दि.२) दिले. सन २०१२-१३ मध्ये सर्व शिक्षा अभियानातर्फे जिल्ह्यातील बहुतांश शाळांना स्वच्छतागृहे बांधण्यासाठी प्रत्येकी १ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून काही शाळांनी स्वच्छतागृहे बांधलीच नसल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर असून, त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे विनोद तांबे यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतीही अनियमितता करू नये, केंद्रप्रमुखांचा पदभार देताना शासन निर्णयानुसार बी. एड. पदवीधारक शिक्षकास सेवाज्येष्ठतेनुसार देण्यात यावा, अशा सूचनाही सभापतींनी केल्या. शिक्षक संवर्गातील पाच वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना स्थायी करावे, शिक्षकांनी नियमानुसार धारण केलेल्या पदवीस कार्योत्तर मान्यता द्यावी, अशी मागणी मधुकर वालतुरे यांनी केली. सभापतींनी आवाहन केल्यानुसार शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेत येणे बंद केले आहे. त्यामुळे सभापतींनी आता सर्व संघटनांची बैठक घेऊन त्यांच्या समस्येवर चर्चा घडवून आणावी, अशी सूचनाही सदस्यांनी केली. बैठकीला समितीचे सदस्य बबन कुंडारे, संतोष माने, पुष्पा जाधव, सुरेखा जाधव, पुष्पा पवार, संगीता सुंभ, श्याम राजपूत, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, भगवान सोनवणे, एन. के. देशमुख, प्रदीप राठोड आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे १५ शिक्षक तहसील कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर आहेत. या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शिक्षण समितीने दिले होते. त्यावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सदर शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करताच काही तहसीलदारांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना धमकावले. त्यामुळे या प्रतिनियुक्त्या रद्द करणे आपल्या ताकदीबाहेर आहे, अशी तक्रार काही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत केली होती. त्यामुळे शिक्षण सभापती यांनी स्वत:च जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.