शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:03 IST

जिल्ह्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली, तर सोयगावात तुरळक ठिकाणी बारीक गारा पडल्या. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले.

चिंचोली लिंबाजीसह परिसराला सोमवारी रात्री वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपले. अर्धा तास पाऊस झाल्याने मका, गहू, हरभरा, कांदा, कांदा बियाणे यासह भाजीपाला व फळबागांना फटका बसला. चिंचोली लिंबाजीसह नेवपूर, वाकी, तळनेर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, जामडी, दहीगाव, शेलगाव, दिगाव, खेडी परिसरात रात्री ८ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शेतकºयांची चांगलीच धांदल उडाली.

सध्या परिसरात शेतकºयांची गहू, हरभरा, मका काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे अनेकांच्या जमा करून ठेवलेल्या राशी पावसाने भिजल्या. यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.अंभईसह पिंपळदरी, लिहाखेडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात सुमारे अर्धा तास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.सोमवारी सायंकाळी ७.१० ला सुरू झालेला पाऊस ७.४० पर्यंत सुरू होता. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे गंजी घालून ठेवलेला मका झाकण्यासाठी व उघड्यावर बांधलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकºयांची एकच तारांबळ उडाली

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव, उपळी, अंधारी, अजिंठा, गोळेगाव, आमठाणा, आमखेडा, घटांब्री, पानवडोद येथे पावसाने सायंकाळी हजेरी लावली. सोयगाव तालुक्यासह बनोटीत मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील अनेक गावांची वीज गुल झाली होती. यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला, तर फुलंब्री तालुक्यात रात्री ९.२५ वाजता पावसाला सुरुवात झाली होती.

सोयगावात तुरळक गारांचा पाऊससोयगाव/फर्दापूर : सोयगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. सोयगाव शहरासह तालुक्यात काही ठिकाणी बारीक गारांचा पाऊस झाल्याचे नागरिकांनी सांगितले, तर फर्दापूर येथे सायंकाळी ६ वाजता वादळी वाºयासह विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. यामुळे शेतकºयांसह नागरिकांची पिके वाचविण्यासाठी धावपळ उडाली. दरम्यान, फर्दापुरात वीज गुल झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेती