शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी साठवा, गाव वाचवा’ अभियान राहिले कागदावरच

By admin | Updated: August 22, 2014 00:58 IST

परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील



परंडा : भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ हे अभियान सुरू केले असून, यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील पाच ग्रामपांयतींची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेला आता तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असला तरी लघु पाटबंधारे विभागाने मात्र निवड झालेल्या ग्रामपंचायतींना अद्याप साधी कल्पनाही दिलेली नाही. त्यामुळे हे अभियान केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.
जून महिन्यात सुरू झालेले हे अभियान १५ आॅक्टोबरपर्यंत राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या अभियानातंर्गत भूजल पातळी सर्वेक्षण व परिक्षण करणे, परिसरात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद करणे, तंत्रशुद्ध पद्धत्तीने वॉटर अकाऊंट करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे, शासकीय-निमशासकीय, खाजगी, इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टींग उभारण्यासाठी प्रत्येक कुटूंबप्रमूख, बचतगटातील महिलांना प्रवृत्त करणे, पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जागोजागी उतारात चर खोदणे, नादुरुस्त तलाव, विहिरी शेततळयांमधील गाळ काढून जलसंचय करणे, भूगर्भस्तर आणि भूजल पातळीच्या क्षमतेनुसार ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे मुल्यमापन करुन या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे आहे.
या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या योजनेत लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने निवड झालेल्या ग्रामपंचयातीमध्ये स्पर्धा लावण्यात आल्या असून, पात्र ग्रामपंचायतींचा शासनाकडून गौरवही होणार आहे.
या अभियानासाठी तालुक्यातील जवळा (नि), भांडगाव, पांढरेवाडी, साकत (बु) आणि मुगाव पाच पाच ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. मात्र, अभियानाचा कालावधी सुरू होऊन अडीच महिने झाले तरी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने अद्याप या ग्रामपंचायतींशी साधा संपर्कही साधला नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पाचही गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे हे अभियान योग्य वेळेत सुरू झाले असते तर टंचाई काळात ग्रामस्थांना याचा फायदा झाला असता. (वार्ताहर)