शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता, पाण्याअभावी नागरिक त्रस्त

By admin | Updated: July 24, 2014 00:26 IST

देगलूर : उशिरा का होईना शासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आणि संप मागे घेण्यास भाग पाडले.

देगलूर : उशिरा का होईना शासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आणि संप मागे घेण्यास भाग पाडले. दरम्यान, संपाच्या काळात देगलूर शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले असून पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत.राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या नगर परिषदेच्या तुलनेत मराठवाड्यातील न. प . कर्मचाऱ्यांंवर सतत अन्याय होत आला आहे. मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. पेन्शन, आजारी रकमेची देयके, ग्रॅच्युईटी अंशदानाची रक्कम कधीच वेळेवर मिळत नाही. त्यामुळे न.प. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. कर्जबाजारीपणामुळे अत्यंत त्रास होतो. या अपमानजनक जीवन जगण्याला कंटाळलेल्या न.प. कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून आपल्या न्यायसंगत मागण्या मान्य करुन घेण्यासाठी बेमुदत संप पुकारला होता. न.प. कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे नगर विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य न.प. कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, मराठवाडा (विभागीय अध्यक्ष मारोतराव गायकवाड यांच्यात झालेली चर्चा असफल ठरल्याने बेमुदत संप सुरूच होता. बुधवारी संप मागे घेण्यात आला. संपामुळे रमजान महिना आणि अन्य सणावारांच्या काळात शहरात स्वच्छतेचा अभाव, पाणीपुरवठाचे तीनतेरा वाजले होते. या संपात देगलूर पालिकेचे हणमंत देशमुख, लालू सोनकांबळे, गोविंद तुंगेनवार, जब्बार कुरेशी, इम्तीयाज हुसेन, सायलू कुंडलवार, बालाजी कंतेवार, जावेद देशमुख, अब्दुल खादर, जब्बार अली, गंगा फरसे, लालाबाई डोपेठवाड, चंद्राबाई वाघमारे, सुशीलाबाई वनंजे, लक्ष्मीबाई वानखेडे, मार्तंड वनंजे, रामचंद्र उल्लेवाड, हरिशंकर ढगे, रत्नदीप सूर्यवंशी, संघरत्न ढवळे, दिनेश कळसकर, दत्तु मारावार, संगम शंकर शंखपाळे, रोयलावर, शिवलिंग गायकवाड, गंगाधर वाघमारे, लक्ष्मण कांबळे, रोजंदार कर्मचारी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)कंधारातील कर्मचाऱ्यांचे ‘मुंडन’ आंदोलन मागे कंधार : न. प. कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन आठवडाभरानंतर मागे घेण्यात आल्याने शासनाचा निषेध म्हणून कंधारात संपकरी कर्मचाऱ्यांनी ‘मुंडन’ आंदोलन २४ रोजी करण्याचे जाहीर केले. ते आता मागे घेण्यात आले. संपामुळे शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आदी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना उलटला आहे. अनेक प्रमाणपत्राची पालकांना शहरात न.प. कडून आवश्यक असतात. विद्युत जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, रजिस्ट्रीसाठी नमुना नं. ४३ व नाहरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, नाव परिवर्तन, विवाह नोंदणी आदी कामासाठी नागरिकांना समस्या निर्माण झाली होती. उशिरा का होईना लक्ष देवून शासनाने तोडगा काढल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. शासनाचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी २४ जुलै रोजी ‘मुंडन’ करण्याचाही निर्णय घेतला होता. संपासाठी संघटनेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, उपाध्यक्ष राहुल खोडसकर, सचिव पठाण बशीर यांच्या सह्या आहेत. संपात संजय फुले, जितेंद्र ठेवरे, शंकर मोरे, सुहास गायकवाड, अजीम उल्ला, सईदखाँ, राजेश जोंधळे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)