शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

२२५ कोटींतून रस्ते; यादी दोन दिवसांत शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:03 PM

राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची यादी दोन दिवसांत शासनाला पाठविण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली.

ठळक मुद्देमहापालिकेच्या सभेत झाला निर्णय : सर्व प्रभागातील रस्त्यांना प्राधान्य दिल्याचा दावा

औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या १२५ कोटी रुपये अनुदानातून ७९ रस्त्यांची यादी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला दिली होती. त्यात प्रशासनाने बदल करून ५७ रस्त्यांसाठी २१२ कोटी रुपयांची यादी गुरुवारच्या सभेसमोर ठेवली होती. त्यात सत्ताधाऱ्यांनी बदल केला. २२५ कोटी रुपयांची यादी दोन दिवसांत शासनाला पाठविण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली.जानेवारी महिन्यात शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी त्यांनी १२५ कोटी रुपये रस्त्यांसाठी निधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार पदाधिकाºयांनी स्वत:च्या धोरणानुसार रस्त्यांची यादी तयार केली होती. प्रशासनाने पदाधिकाºयांच्या रस्त्यांच्या यादीला खो देऊन नवीन यादी तयार केली. त्या यादीचे पीपीटी सादरीकरण आज सभागृहात करण्यात आले. पीपीटीमध्ये काही रस्त्यांची नावे दोनदा आल्याचे सदस्यांनी सभागृहात सांगितले. १०० कोटींतून करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांची यादी मध्ये असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. रस्त्यांच्या यादीत बदल करण्यासह २१२ कोटींची यादी २२५ कोटी रुपयांवर नेण्यात आली. त्यात पदाधिकाºयांनी सुचविलेल्या रस्त्यांचा समावेश करण्यासह प्रस्ताव मंजूर करण्यात आला.पाणी प्रश्नावरून भाजपचा जेलभरो आंदोलनाचा इशारापाणी प्रश्नावरून भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी वॉर्डातील पाणी प्रश्न सुटला नाही तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा देत सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. तर नगरसेवक नितीन चित्ते यांनी थेट लोटांगण घालून वॉर्डातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी महापौर, आयुक्तांकडे केली. यावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. एमआयएम नगरसेवकांच्या निलंबनानंतर अडीच वाजेच्या सुमारास सर्वसाधारण सभा पुन्हा सुरू झाली. भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून शिवसेनेसह प्रशासनाची कोंडी केली. आयुक्त डॉ. निपुण विनायक, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना याप्रकरणी खुलासा करण्यास महापौरांनी सांगितले. कोल्हे म्हणाले, ६७ एमएलडी पाणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक्स्प्रेस जलवाहिनी टाकली. त्यातून शून्य एमएलडी पाणीदेखील वाढले नाही. आयुक्त म्हणाले, समान पाणी वाटपाबद्दल प्रशासन काम करीत आहे. त्याचे आऊटपूट लवकरच मिळेल. माजी महापौर भगवान घडमोडे, सचिन खैरे, अंकिता विधाते, सत्यभामा शिंदे, सीताराम सुरे, राजगौरव वानखेडे, भाऊसाहेब जगताप यांनी आपापल्या वॉर्डातील पाणी प्रश्न सभागृहात मांडला.-------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad transportरस्ते वाहतूक