शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:39 IST

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. मागील सात दिवसांत ३४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, सोमवारी सकाळपर्यंत १० मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील शिल्लक पिकांचा चिखल हाेऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतीचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहेविभागात ४५० पैकी २८५ मंडळात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आहे. विभागातील निम्न दुधना वगळता सर्व ११ प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होत आहे. ८७५ लघु व मध्यम प्रकल्पांत सध्या ९० टक्के जलसाठा आहे.

ऑक्टोबर महिन्यात आजवर मराठवाड्यात ९५ मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाच्या ६७९ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ७७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १ हजार १०८ मि.मी. पाऊस झाला होता. मराठवाड्यासह राज्यात १८ ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत गारपीट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो आहे.

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टीतून वाचलेली पिके आता या परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहेत. सरकारने आतापर्यंत १,६०८ काेटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी दिली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अतिवृष्टी१७ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात ७० मि.मी., जालना जिल्ह्यात राजूर, केदारखेडा, जाफराबाद, कुंभारझरी, रामनगर, टेंभुर्णी या सर्व मंडळात प्रत्येकी ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील गंगामसला मंडळात ७९, तर केजमधील नांदूरघाट मंडळात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादमधील केशगाव मंडळात ६६ मि.मी. पाऊस बरसला. विभागात ७ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत १४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान १० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद