शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:39 IST

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. मागील सात दिवसांत ३४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, सोमवारी सकाळपर्यंत १० मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील शिल्लक पिकांचा चिखल हाेऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतीचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहेविभागात ४५० पैकी २८५ मंडळात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली आहे. विभागातील निम्न दुधना वगळता सर्व ११ प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होत आहे. ८७५ लघु व मध्यम प्रकल्पांत सध्या ९० टक्के जलसाठा आहे.

ऑक्टोबर महिन्यात आजवर मराठवाड्यात ९५ मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाच्या ६७९ वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ७७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११३ टक्के असून, गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १ हजार १०८ मि.मी. पाऊस झाला होता. मराठवाड्यासह राज्यात १८ ऑक्टोबरपर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत गारपीट, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतो आहे.

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टीतून वाचलेली पिके आता या परतीच्या पावसामुळे धोक्यात आली आहेत. सरकारने आतापर्यंत १,६०८ काेटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी दिली आहे.

१७ ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अतिवृष्टी१७ ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात ७० मि.मी., जालना जिल्ह्यात राजूर, केदारखेडा, जाफराबाद, कुंभारझरी, रामनगर, टेंभुर्णी या सर्व मंडळात प्रत्येकी ७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील गंगामसला मंडळात ७९, तर केजमधील नांदूरघाट मंडळात ६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादमधील केशगाव मंडळात ६६ मि.मी. पाऊस बरसला. विभागात ७ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत १४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान १० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद