शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

परतीच्या पावसाचा फटका; मराठवाड्यात ३ हजार कोटींचे अनुदान लागणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 2:22 PM

पावसामुळे ९० टक्के खरीप हंगामाची माती 

औरंगाबाद : मराठवाड्यात परतीच्या व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या खरीप हंगामाची माती झाली. नुकसानीचे पंचनामे सोमवारी पूर्ण करण्यात आले. विभागातील ४८ लाख हेक्टरपैकी तब्बल ३७ लाख हेक्टरवरील पिके अवकाळी पावसामुळे गेली. केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार विभागाला अनुदानापोटी अंदाजे ३ हजार कोटींची गरज असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.  

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ९९.१६ टक्के  हेक्टवरील पंचनामे पूर्ण झाले. शनिवारपर्यंत नुकसानीचा अहवाल शासनाकडे जाईल. दररोज ६ लाख हेक्टवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दुष्काळी अनुदानाच्या १३ मे २०१५ च्या निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टर ६ हजार ८००, फळबागांसाठी प्रतिहेक्टर १८ हजार तर बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येते. त्यानुसार अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

आॅक्टोबर महिन्यातच तब्बल ३३७.८५ टक्के  अधिक पाऊस झाला असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या तसेच अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील तब्बल ३४ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. सर्वाधिक १४ लाख २९ हजार हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. कापूस पिकाचे ११ लाख ४२ हजार हेक्टर, मका पिकाचे २ लाख ३२ हजार हेक्टर, बाजरी ९२ हजार ५२३ हेक्टर, ज्वारी ६० हजार तर इतर पिकांचे २५ हजार हेक्टरवरील पीक पावसामुळे वाया गेले. 

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयfundsनिधी