शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:40 IST

वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळच्या सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी शेकडो खिळे ठोकल्याचे मंगळवारी रात्री आढळून आले आहे. यामुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले असून, या खिळ्यांमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती सुरू होती की  हा घातपाताचा प्रयत्न होता असा सवाल उपस्थित होत आहे.

हा प्रकार काही वाहनधारकांनी घटनास्थळापासून व्हिडिओ करून समोर आणला. व्हिडिओमधील माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. अशातच, रस्त्याच्या काही भागावर हे खिळे ठोकण्यात आले होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना नव्हती, किंवा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा फलकही लावलेला नव्हता. त्यामुळे, अनेक वाहनचालकांना या खिळ्यांचा अंदाज आला नाही आणि त्यांच्या गाड्यांचे टायर पंक्चर झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समृद्धी महामार्गावर असे प्रकार याआधीही घडले आहेत. त्यामुळे, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून घातपाताचा प्रयत्न?समृद्धी महामार्गावरील ही घटना केवळ अपघात किंवा निष्काळजीपणा नसून, त्यामागे घातपाताचा किंवा लुटमारीचा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने रस्त्यावर शेकडो खिळे ठोकले गेले होते, ते पाहता हा एखाद्या कटाचा भाग वाटतो. या खिळ्यांमुळे गाड्यांचे टायर पंक्चर झाल्यानंतर चालक मदतीसाठी थांबतो, अशा वेळी त्यांना लुटण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. यामुळे, हा फक्त अपघात नसून, वाहनचालकांना अडकवून त्यांना लुटण्याचा पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास होणे गरजेचे आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वाहनधारकांनी म्हंटले आहे. दरम्यान, काहींच्या मते हे खिळे नसून छोटे पाइप आहेत, या द्वारे महामार्ग दुरुस्तीसाठी केमिकल सोडण्यात येत होते. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हया घटनेमुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गाच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'अधिकारी आणि कंत्राटदारांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही का?' असा सवाल अनेक वाहनचालकांनी विचारला आहे. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून मागून येणाऱ्या गाड्यांना सूचना देऊन सावध केले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. 

पोलिसांचे सहकार्य नसतेया घटनेचा अनुभव घेतलेल्या संतोष सानप नावाच्या प्रवाशाने सांगितले की, "मी कुटुंबासोबत जालना येथून पनवेलला जात होतो. माझ्या गाडीसोबत अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले. यापूर्वीही माझ्यासोबत असे घडले आहे. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावरही कोणतेही सहकार्य मिळत नाही. प्रशासन आणि कंत्राटदार नेमके काय करत आहेत?"

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात