शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

रेल्वे प्रवाशांना दिलासा; ‘जनशताब्दी’ पुन्हा ‘सीएसटी’वरून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 3:15 PM

जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सीएसटीपर्यंत नेल्यामुळे  औरंगाबाद आणि जालन्याच्या नागरिकांना फायदा होईल.

ठळक मुद्देजनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे.तोट्यात चालत असल्याने नंदीग्राम एक्स्प्रेस नांदेडपर्यंतच चालविण्यासाठी हालचाली

औरंगाबाद : जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (सीएसटी) धावण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दुसरीकडे  नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ नांदेडपर्यंतच चालविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. एका दिवसात मुंबईला जाऊन आपले काम करून याच रेल्वेने परत येण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त आहे. ही रेल्वे सुरुवातीला मुंबईपर्यंत (सीएसटी) धावत होती; परंतु पुढे जनशताब्दीची धाव ही दादरपर्यंत केली गेली. २०१५ मध्ये ही जनशताब्दी जालन्यापर्यंत वाढविण्यात आली. दादरवरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याने लोकांच्या सुविधेसाठी ही रेल्वे पुन्हा सीएसटीपर्यंत नेण्याची मागणी केली जात होती. अखेर त्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सीएसटीपर्यंत नेल्यामुळे  औरंगाबाद आणि जालन्याच्या नागरिकांना फायदा होईल. नंदीग्राम एक्स्प्रेस नांदेड ते नागपूरदरम्यान तोट्यात चालत असल्याने प्रशासनाने ही रेल्वे नांदेडपर्यंतच चालविण्याचा निर्णय घेतला. याचाही मराठवाड्याला फायदा होईल. असे असले तरी भोकर, हिमायतनगर, किनवट, अदिलाबादच्या नागरिकांची गैरसोय होईल, असे स्वानंद सोळंके यांनी सांगितले.   जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून आणि नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ नांदेडपर्यंतच चालविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे पत्र प्राप्त झाल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले.

कार्यालयीन पत्र, अधिक माहिती नाहीया दोन्ही रेल्वेसंदर्भातील पत्र कार्यालयीन आहे. त्याविषयी अद्याप काही अधिक माहिती प्राप्त नाही, त्यामुळे काय निर्णय झाला, हे आता सांगता येणार नाही, असे ‘दमरे’च्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटनMumbaiमुंबई