शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

औरंगाबादेत होणार विभागीय जलसाक्षरता केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:23 PM

समाजात जलजागृती निर्माण होण्यासाठी औरंगाबादेत विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देराज्यात यशदा, पुणे येथे कायमस्वरूपी मुख्य जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली आहे.या सोबतच जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे हे केंद्र स्थापन करण्यास बुधवारी शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली.

औरंगाबाद : राज्यात वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. एकप्रकारे गरजेपेक्षा पाणी कमीच असल्याची परिस्थिती आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, पावसाचा लहरीपणा यामुळे भविष्यात पाण्यावरील ताण आणखी वाढणार आहे. त्यामुळे पाण्याचा नियोजनपूर्वक आणि काटकसरीने वापर करण्यासाठी समाजात जलजागृती निर्माण होण्यासाठी औरंगाबादेत विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे हे केंद्र स्थापन करण्यास बुधवारी शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली.

राज्यात यशदा, पुणे येथे कायमस्वरूपी मुख्य जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली आहे. यासोबत औरंगाबादेतील वाल्मीसह अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी आणि चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.भविष्यात गरजेप्रमाणे उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. संपूर्ण मराठवाड्यात जलसाक्षरता निर्माण करण्याची जबाबदारी औरंगाबादच्या विभागीय केंद्राच्या माध्यमातून पार पाडली आहे. 

पाण्याचा पुनर्वापर केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, कार्यशाळा, वाचन साहित्य, प्रसार साहित्यांद्वारे जनतेत जलसाक्षरता निर्माण करण्यासह जलसाठे, जलसंधारणाची कामे, सिंचन प्रकल्प, पाण्याचे प्रदूषण, त्यावरील उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर यासंदर्भात साहित्य निर्माण करणे, जनतेला उपलब्ध करून देण्यासह संशोधन, अभ्यास, प्रलेखन केले जाईल. विभागीय जलसाक्षरता केंद्राच्या संरचनेत विभागीय संचालक, विभागीय कार्यकारी संचालक यांच्यासह प्रलेखन, प्रशिक्षण अधिकारी, लिपिक, टंकलेखक राहतील.

जलसेवक, जलनायकांची फळीजलजागृती व जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम तयार करणे, जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जलसाक्षरता केंद्रात केली जाणार आहे. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर जलनायक, जययोद्धा, जलदूत, जलसेवक आणि शासन स्तरावर कार्यरत किंवा शासन सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी जलकर्मी अशा स्वयंसेवकांची फळी निर्माण केली जाणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजना